शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

उल्हासनगर वगळून राज्यातील ३० सिंधी वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी शासनाची अभय योजना

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2025 19:43 IST

उल्हासनगरला होणार विशेष अध्यादेशाचा फायदा... आयुक्त मनीषा आव्हाळे 

सदानंद नाईक, उल्हासनगर :उल्हासनगर वगळून १४ जिल्हातील विस्थापित झालेल्या ३० सिंधी समाज पट्ट्याला मालकी हक्क देण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना लागू केली. तर शहराला यापूर्वी लागू केलेल्या विशेष अध्यादेशाचा फायदा देण्याचे काम सुरु असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली.

राज्यातील उल्हासनगर मध्ये सर्वाधिक संख्येने सिंधी समाज राहत असून लोकसंख्या ३ लाखा पेक्षा जास्त आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून आजपर्यंत सिंधी समाजाचा आमदार निवडून आला आहे. तसेच अंबरनाथ व कल्याण पुर्व मतदारसंघात सिंधी समाजाचे निर्णायक मते आहेत. शहरातील अवैध बांधकामचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी १८ वर्षांपूर्वी बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. याच अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. 

दरम्यान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यात स्थायिक झालेल्या सिंधी विस्थापितांना जमिनीचे मालकी हक्क देणे, महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियमात सुधारणा करणे, नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करणे अशा विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील सिंधी समाजातील विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना २०२५ लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई, मुंबईतील मुलुंड (पश्चिम), सायन, नागपूरमधील जरीपटका, जळगावमधील चाळीसगाव, अमळनेर यांसारख्या राज्यभरातील ३० सिंधी वसाहतींतील जमिनीचे पट्टे नियमित करता येणार आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर वगळता, २४ जानेवारी १९७३ च्या राजपत्रात जाहीर करण्यात आलेल्या ३० अधिसूचित क्षेत्रांमध्ये ही विशेष अभय योजना लागू होणार आहे. या योजनेची मुदत एक वर्ष असेल. या अंतर्गत सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक जमिनींचे पट्टे नियमित केले जातील. १५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी उपयोगासाठी असलेल्या जमिनीच्या पट्ट्यांसाठी ५ टक्के अधिमूल्य आकारले जाईल (फ्रीहोल्डसाठी). तर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी १० टक्के अधिमूल्य आकारले जाईल. १५०० चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळासाठी दुहेरी दराने अधिमूल्य घेतले जाईल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर