शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

उल्हासनगर वगळून राज्यातील ३० सिंधी वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी शासनाची अभय योजना

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2025 19:43 IST

उल्हासनगरला होणार विशेष अध्यादेशाचा फायदा... आयुक्त मनीषा आव्हाळे 

सदानंद नाईक, उल्हासनगर :उल्हासनगर वगळून १४ जिल्हातील विस्थापित झालेल्या ३० सिंधी समाज पट्ट्याला मालकी हक्क देण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना लागू केली. तर शहराला यापूर्वी लागू केलेल्या विशेष अध्यादेशाचा फायदा देण्याचे काम सुरु असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली.

राज्यातील उल्हासनगर मध्ये सर्वाधिक संख्येने सिंधी समाज राहत असून लोकसंख्या ३ लाखा पेक्षा जास्त आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून आजपर्यंत सिंधी समाजाचा आमदार निवडून आला आहे. तसेच अंबरनाथ व कल्याण पुर्व मतदारसंघात सिंधी समाजाचे निर्णायक मते आहेत. शहरातील अवैध बांधकामचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी १८ वर्षांपूर्वी बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. याच अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. 

दरम्यान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यात स्थायिक झालेल्या सिंधी विस्थापितांना जमिनीचे मालकी हक्क देणे, महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियमात सुधारणा करणे, नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करणे अशा विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील सिंधी समाजातील विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना २०२५ लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई, मुंबईतील मुलुंड (पश्चिम), सायन, नागपूरमधील जरीपटका, जळगावमधील चाळीसगाव, अमळनेर यांसारख्या राज्यभरातील ३० सिंधी वसाहतींतील जमिनीचे पट्टे नियमित करता येणार आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर वगळता, २४ जानेवारी १९७३ च्या राजपत्रात जाहीर करण्यात आलेल्या ३० अधिसूचित क्षेत्रांमध्ये ही विशेष अभय योजना लागू होणार आहे. या योजनेची मुदत एक वर्ष असेल. या अंतर्गत सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक जमिनींचे पट्टे नियमित केले जातील. १५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी उपयोगासाठी असलेल्या जमिनीच्या पट्ट्यांसाठी ५ टक्के अधिमूल्य आकारले जाईल (फ्रीहोल्डसाठी). तर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी १० टक्के अधिमूल्य आकारले जाईल. १५०० चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळासाठी दुहेरी दराने अधिमूल्य घेतले जाईल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर