शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

गोविंदाला हवा एकवार मदतीचा हात

By admin | Updated: May 3, 2017 05:44 IST

घरी अठराविश्वे द्रारिद्र्य असताना इयत्ता दहावीत ८३.२० टक्के गुण मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने इयत्ता अकरावीमध्ये आपली यशाची

प्रज्ञा म्हात्रे / ठाणेघरी अठराविश्वे द्रारिद्र्य असताना इयत्ता दहावीत ८३.२० टक्के गुण मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने इयत्ता अकरावीमध्ये आपली यशाची भरारी कायम ठेवत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विज्ञान शाखेत शिकत असलेल्या गोविंदाला आयएएस होण्याची तीव्र इच्छा असली तरी बारावीचाच शैक्षणिक खर्च कसा करायचा हा यक्षप्रश्न राठोड कुटुंबासमोर आहे. बिगारी काम करणाऱ्याच्या मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न कसे साकार होणार, अशी गोविंदाच्या वडिलांना चिंता लागली आहे. कळव्यातील जयभीम नगर येथील छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या गोविंदाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले. दहावीनंतर हे यश टिकवून ठेवणे त्याच्यासाठी आव्हान होते. दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणारी अनेक मुले ही भाषेच्या अडचणीमुळे अकरावीत गंटागळ््या खातात हे आपण पाहिले आहे. मात्र एकीकडे घरची गरिबी आणि दुसरीकडे शिक्षणासाठी सुरु असलेली धडपड अशी तारेवरील कसरत करीत त्याने इयत्ता अकरावीमध्येही यश कायम राखले. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय आणि केळकर महाविद्यालयात त्याने प्रवेश अर्ज भरला होता. परंतु काही आवश्यक कागदपत्रांअभावी या ठिकाणी त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्याला न्यू कळवा महाविद्यालयात विज्ञान शाखेतून शिकण्याकरिता त्याला प्रवेश मिळाला. प्रवेशासाठी लागणारी ८३०० रुपये फी कशी भरायची हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर होता. फी कमी करण्यासाठी त्याच्या कुटुंबाने महाविद्यालयाला विनंती केली. परंतु ती मान्य झाली नाही. गोविंदाला अकरावी प्रवेशाकरिता शाळेतील शिक्षक, काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत मिळाली. अगोदर पाच हजार रुपये आणि दोन महिन्यांनी उर्वरित पैसे भरून त्याने प्रवेश घेतला होता. घरची गरिबी आणि आपण चांगले शिकून आई-वडिलांना या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जिद्द यामुळे गोविंदा दिवस रात्र अभ्यास करीत होता. घरची जबाबदारी सांभाळत त्याने अकरावीच्या परीक्षेकरिता घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. त्याने ७९.८४ टक्के मिळवून विज्ञान शाखेतून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. प्रथम आल्याबद्दल त्याच्याकडे सर्वजण पेढे मागू लागले पण त्यावेळी त्याच्या खिशात फक्त २० रुपये होते. मात्र त्याने हसतमुखाने आपल्या मित्रमंडळींच्या हातावर पेढे ठेवले. आई-वडील बेरोजगार गोविंदाला आयएएस व्हायचे आहे. त्याच्या आई वडिलांना त्याला शिकवायची तीव्र इच्छा आहे. पण दोघांनाही सध्या काम नाही. त्यात वडील आजारी असल्याने ते घरी असतात. त्यामुळे आता इयत्ता बारावीची फी कशी भरायची असा प्रश्न गोविंदासमोर आहे.