शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुनील जोशी यांना गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:41 IST

अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कल्याण : आठ वर्षांपासून व्यावसायिक संगीत रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करणारे कल्याणचे सुनील जोशी यांना पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटकातील उल्लेखनीय कामगिरीविषयी हा पुरस्कार जोशी यांना देण्यात आला आहे.पुण्यातील बालगंधर्व नाट्य रसिक मंडळ ४२ वर्षांपासून कार्यरत आहे. या मंडळाकडून हा पुरस्कार जोशी यांना दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रोख रुपये, शाल श्रीफळ आणि मानचिन्ह असे आहे. १४ जुलैला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात जोशी यांना प्रदान केला जाणार आहे.जोशी हे कल्याणमध्ये राहतात. नाटकाची आवड त्यांना शालेय जीवनापासूनच असल्याने १९९६ पासून ते हौशी नाट्यकलाकार म्हणून नाटकात काम करत होते. २०११ सालापासून ते व्यावसायिक संगीत नाटकात काम करत आहेत.आतापर्यंत जोशी यांनी संगीत जयजय गौरीशंकर, कान्होपात्रा, सौभद्र, संत गोराकुंभार, संन्यस्त खड्ग, देवमाणूस, कुलवधू, स्वयंवर, संत ज्ञानेश्वर या नाटकात भूमिका, निर्मिती आणि दिग्दर्शनाचे काम केले आहे.जोशी यांना यापूर्वी स्वरबहार विश्वनाथ बागुल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा काकासाहेब खाडिलकर या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. गोविंद बल्लाळ देवल हा त्यांचा तिसरा पुरस्कार आहे. त्यांनी पुरस्कारात हॅट्ट्रिक केली आहे.>संगीत नाट्यभूमी दुर्लक्षित झाली होती. तिच्याकडे रसिकांनी पाठ फिरवली होती. पुन्हा तिला चांगले दिवस आणून देण्यासाठी २०११ पासून ही नाटके केली. या नाटकात तरुण कलाकारांनी काम करावे, असा आग्रह धरला. संगीत नाटकातील जुन्या धक्का न पोहोचवता. तसेच तीन तासांत ही नाटके बसवली. रसिकाला कंटाळवाणे वाटणार नाही, अशी त्याची मांडणी केली. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे मी केलेल्या कामाला मिळालेली पावती आहे, असे मला वाटते. पुरस्कार मिळाल्याने मला व माझ्या टीमला खूप आनंद झाला आहे. पुरस्काराने माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे.- सुनील जोशी