शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

ओबीसींचा हक्क हिसकावण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

भिवंडी - राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा ...

भिवंडी - राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यांत ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असे असताना महाराष्ट्र सरकारने जो अध्यादेश काढला आहे, तो म्हणजे ओबीसींची दिशाभूल करण्याचे षडयंत्र असल्याचे मत ठाणे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मांडले व राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला.

आम्ही ५० % च्या अधीन राहून ओबीसींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले. मात्र, अध्यादेश काढणे म्हणजे ओबीसींची मते मिळविण्यासाठी चाललेले नाटक आहे. मराठा आरक्षणाची जशी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या पक्षांनी वाट लावली, त्याचप्रमाणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप खेळत आहेत. या फसवणुकीच्या षडयंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे, असे सुनील भगत म्हणाले.

तसेच ठाणे-भिवंडी रस्त्यावर एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे काम चालू आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असूनही टोलवसुली केली जाते. त्यामुळे ती वसुली बंद करण्यात यावी, अशी मागणी भगत यांनी केली. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ २४ सप्टेंबर रोजी कशेळी टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.