शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि विदर्भाचा औद्योगिक विकास होणार आहे. या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथून येजा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मराठवाड्याला राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच मराठवाड्यात असलेली ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने मराठवाडा भूषण व मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा ऑनलाईन आयोजिला होता. सामाजिक बांधिलकी जपत भरीव कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्तींना मराठवाडा भूषण व रत्न असे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी हा सोहळा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, संतोष कदम, सचिव डॉ. अविनाश भागवत यात उपस्थित होते.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑल्मिपक-पॅराऑलम्पिक संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले चैतन्य भंडारे, उपजिल्हाधिकारी वशिमा शेख, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल उमेश खोसे, निराधार वृद्ध आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या मनोज पांचाळ, कृषी क्षेत्रातील भरीव संशोधनाबद्दल उमेश खरात, मेडिसिन अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या कोंडाबाई भोसले, कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या डॉ. अमरदीप गरड यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याला अनंत भालेराव, गोविंद श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्व लाभले. तेव्हापासून मराठवाडा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वारशात योगदान देत आहे. सध्या आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैयक्तिक सुख- दुखे बाजूला ठेवून काम केले, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवडही सार्थ आहे, असे शिंदे म्हणाले.

तर कोरोनाविरोधी लढाईत मी एकटा लढलो नाही. त्यामागे डॉक्टरांची, आरोग्यसेवकांची फौज आहे, तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचीही या लढाईत साथ लाभली, त्या सर्वांचे योगदान असल्याने त्या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करतो, अशा भावना राजेश टोपे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान दिवंगत कार्यकर्ते माधवराव नाईक, प्रा. तु.शं. कुलकर्णी, पत्रकार सोपान बोंगाणे, सुभाष सपाटे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.