शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि विदर्भाचा औद्योगिक विकास होणार आहे. या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथून येजा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मराठवाड्याला राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच मराठवाड्यात असलेली ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने मराठवाडा भूषण व मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा ऑनलाईन आयोजिला होता. सामाजिक बांधिलकी जपत भरीव कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्तींना मराठवाडा भूषण व रत्न असे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी हा सोहळा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, संतोष कदम, सचिव डॉ. अविनाश भागवत यात उपस्थित होते.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑल्मिपक-पॅराऑलम्पिक संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले चैतन्य भंडारे, उपजिल्हाधिकारी वशिमा शेख, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल उमेश खोसे, निराधार वृद्ध आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या मनोज पांचाळ, कृषी क्षेत्रातील भरीव संशोधनाबद्दल उमेश खरात, मेडिसिन अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या कोंडाबाई भोसले, कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या डॉ. अमरदीप गरड यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याला अनंत भालेराव, गोविंद श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्व लाभले. तेव्हापासून मराठवाडा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वारशात योगदान देत आहे. सध्या आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैयक्तिक सुख- दुखे बाजूला ठेवून काम केले, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवडही सार्थ आहे, असे शिंदे म्हणाले.

तर कोरोनाविरोधी लढाईत मी एकटा लढलो नाही. त्यामागे डॉक्टरांची, आरोग्यसेवकांची फौज आहे, तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचीही या लढाईत साथ लाभली, त्या सर्वांचे योगदान असल्याने त्या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करतो, अशा भावना राजेश टोपे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान दिवंगत कार्यकर्ते माधवराव नाईक, प्रा. तु.शं. कुलकर्णी, पत्रकार सोपान बोंगाणे, सुभाष सपाटे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.