शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - समृध्दी महामार्गामुळे जालना, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा एकूणच मराठवाडा आणि विदर्भाचा औद्योगिक विकास होणार आहे. या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथून येजा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मराठवाड्याला राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच मराठवाड्यात असलेली ११ धरणे एकमेकांना जोडण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने मराठवाडा भूषण व मराठवाडारत्न पुरस्कार सोहळा ऑनलाईन आयोजिला होता. सामाजिक बांधिलकी जपत भरीव कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्तींना मराठवाडा भूषण व रत्न असे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी हा सोहळा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, संतोष कदम, सचिव डॉ. अविनाश भागवत यात उपस्थित होते.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑल्मिपक-पॅराऑलम्पिक संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले चैतन्य भंडारे, उपजिल्हाधिकारी वशिमा शेख, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल उमेश खोसे, निराधार वृद्ध आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या मनोज पांचाळ, कृषी क्षेत्रातील भरीव संशोधनाबद्दल उमेश खरात, मेडिसिन अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या कोंडाबाई भोसले, कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या डॉ. अमरदीप गरड यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्याला अनंत भालेराव, गोविंद श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांचे नेतृत्व लाभले. तेव्हापासून मराठवाडा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, भौगोलिक वारशात योगदान देत आहे. सध्या आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैयक्तिक सुख- दुखे बाजूला ठेवून काम केले, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवडही सार्थ आहे, असे शिंदे म्हणाले.

तर कोरोनाविरोधी लढाईत मी एकटा लढलो नाही. त्यामागे डॉक्टरांची, आरोग्यसेवकांची फौज आहे, तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचीही या लढाईत साथ लाभली, त्या सर्वांचे योगदान असल्याने त्या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करतो, अशा भावना राजेश टोपे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. कार्यक्रमादरम्यान दिवंगत कार्यकर्ते माधवराव नाईक, प्रा. तु.शं. कुलकर्णी, पत्रकार सोपान बोंगाणे, सुभाष सपाटे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.