शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:52 IST

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे.

कल्याण : कोरोनामुळे सर्वत्र उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात मिठाई विक्रेत्यांनाही फार मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांमध्ये केवळ ३५ ते ४० टक्के च व्यवसाय झाल्याने पुढे येणाऱ्या सणांना कसा प्रतिसाद मिळेल, याची चिंता मिठाई विक्रेत्यांना लागली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ने कल्याणमधील सुप्रसिद्ध अनंत हलवाईचे संचालक व मिठाई-फरसाण असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अनंत गवळी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी कोरोनामुळे मिठाई विक्रेत्यांसमोर उद्भवलेली आव्हाने आणि व्यवसायात आलेली प्रतिकूलता, यावर भाष्य केले.

कोरोनामुळे चार ते पाच महिने मिठाईची दुकाने बंद होती. एकीकडे व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे मात्र भरमसाट वाढीव वीजबिले मिठाई विक्रेत्यांना आली आहेत. कोरोनाच्या काळात अन्य उद्योजकांना तसेच काही घटकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. परंतु, आमच्यासारख्या व्यावसायिकांकडे मात्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आम्हा मिठाई विक्रेत्यांना कोणी वाली नाही. आम्हीदेखील आजच्याघडीला कामगारांना रोजगार देतो आहोत, पण व्यवसायात नुकसान झाले असताना कोणतीही आर्थिक मदत अथवा सवलतीची कोणतीही योजना सरकारकडून जाहीर झालेली नाही, असे गवळी म्हणाले. गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. परंतु, कोरोनामुळे या सणात फार कमी व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पुढील सणांबरोबरच दिवाळीची चिंता आम्हाला लागली आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच पावसाचा फटकाही व्यवसायाला बसल्याचे गवळी म्हणाले. दरम्यान, अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू झाले आहेत. यात पुढील काळात खाद्यप्रेमींसाठी ड्रायफ्रुट्सची फॅन्सी मिठाई आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खवय्यांसाठी ही मेजवानी असेल, असे ते म्हणाले.‘मालमत्ताकर, वाढीव वीजबिलांमध्ये सवलत द्या’आम्ही विक्रेते प्रामाणिकपणे कर भरतो. कोरोनामुळे व्यवसाय तोट्यात असताना मालमत्ताकर तसेच वाढीव वीजबिलांमध्ये काही प्रमाणात का होईना सवलत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा सरकारकडून असल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव