शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:52 IST

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे.

कल्याण : कोरोनामुळे सर्वत्र उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात मिठाई विक्रेत्यांनाही फार मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांमध्ये केवळ ३५ ते ४० टक्के च व्यवसाय झाल्याने पुढे येणाऱ्या सणांना कसा प्रतिसाद मिळेल, याची चिंता मिठाई विक्रेत्यांना लागली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ने कल्याणमधील सुप्रसिद्ध अनंत हलवाईचे संचालक व मिठाई-फरसाण असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अनंत गवळी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी कोरोनामुळे मिठाई विक्रेत्यांसमोर उद्भवलेली आव्हाने आणि व्यवसायात आलेली प्रतिकूलता, यावर भाष्य केले.

कोरोनामुळे चार ते पाच महिने मिठाईची दुकाने बंद होती. एकीकडे व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे मात्र भरमसाट वाढीव वीजबिले मिठाई विक्रेत्यांना आली आहेत. कोरोनाच्या काळात अन्य उद्योजकांना तसेच काही घटकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. परंतु, आमच्यासारख्या व्यावसायिकांकडे मात्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आम्हा मिठाई विक्रेत्यांना कोणी वाली नाही. आम्हीदेखील आजच्याघडीला कामगारांना रोजगार देतो आहोत, पण व्यवसायात नुकसान झाले असताना कोणतीही आर्थिक मदत अथवा सवलतीची कोणतीही योजना सरकारकडून जाहीर झालेली नाही, असे गवळी म्हणाले. गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. परंतु, कोरोनामुळे या सणात फार कमी व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पुढील सणांबरोबरच दिवाळीची चिंता आम्हाला लागली आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच पावसाचा फटकाही व्यवसायाला बसल्याचे गवळी म्हणाले. दरम्यान, अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू झाले आहेत. यात पुढील काळात खाद्यप्रेमींसाठी ड्रायफ्रुट्सची फॅन्सी मिठाई आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खवय्यांसाठी ही मेजवानी असेल, असे ते म्हणाले.‘मालमत्ताकर, वाढीव वीजबिलांमध्ये सवलत द्या’आम्ही विक्रेते प्रामाणिकपणे कर भरतो. कोरोनामुळे व्यवसाय तोट्यात असताना मालमत्ताकर तसेच वाढीव वीजबिलांमध्ये काही प्रमाणात का होईना सवलत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा सरकारकडून असल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव