शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

दोन कोटी झाडे लागवडीचा शासनाचा उपक्रम

By admin | Updated: April 22, 2016 02:05 IST

महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ

दत्ता म्हात्रे,  पेणमहाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ या सर्व मानवनिर्मित हस्तक्षेपाचा फटका, निसर्गचक्रात केलेला वारंवार बदल याची फार मोठी किंमत मानवी समाजासह जीवसृष्टीला भोगावी लागली आहे. याच संकटाचा धडा घेत राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षात सबंध राज्यभरात हिरव्या गालिच्यांचा संकल्प केला आहे. तब्बल २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३१ मेपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेशच सामाजिक वनीकरण व वनविभागाला दिले आहेत.पृथ्वीच्या घटकामध्ये, भूमी, जल, वायू, आकाश व प्रकाश (तेज) या नैसर्गिक संजीवक घटकांची शुध्दता व सजीव सृष्टीचे रक्षण करणे ही मानवी समाजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या तत्वानुसारच भविष्यात मार्गक्रमणा करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी उद्योजक, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.यावर्षीचा पाऊस १०६ टक्के पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रम जाहीर झाला आहे. वृक्षमहोत्सव काळात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाने संकल्प केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीपैकी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वनविकास महामंडळ यांनी १ कोटी ५० लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे.