शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दोन कोटी झाडे लागवडीचा शासनाचा उपक्रम

By admin | Updated: April 22, 2016 02:05 IST

महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ

दत्ता म्हात्रे,  पेणमहाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ या सर्व मानवनिर्मित हस्तक्षेपाचा फटका, निसर्गचक्रात केलेला वारंवार बदल याची फार मोठी किंमत मानवी समाजासह जीवसृष्टीला भोगावी लागली आहे. याच संकटाचा धडा घेत राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षात सबंध राज्यभरात हिरव्या गालिच्यांचा संकल्प केला आहे. तब्बल २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३१ मेपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेशच सामाजिक वनीकरण व वनविभागाला दिले आहेत.पृथ्वीच्या घटकामध्ये, भूमी, जल, वायू, आकाश व प्रकाश (तेज) या नैसर्गिक संजीवक घटकांची शुध्दता व सजीव सृष्टीचे रक्षण करणे ही मानवी समाजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या तत्वानुसारच भविष्यात मार्गक्रमणा करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी उद्योजक, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.यावर्षीचा पाऊस १०६ टक्के पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रम जाहीर झाला आहे. वृक्षमहोत्सव काळात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाने संकल्प केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीपैकी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वनविकास महामंडळ यांनी १ कोटी ५० लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे.