शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी झाडे लागवडीचा शासनाचा उपक्रम

By admin | Updated: April 22, 2016 02:05 IST

महाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ

दत्ता म्हात्रे,  पेणमहाराष्ट्रावर गेली चार वर्षे पडलेले दुष्काळाचे सावट, जागतिक तापमान वाढीने घटलेले पर्जन्यमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट व कोसळणारे हिमकडे, नद्यांची सुकलेली पात्रे, धरणांनी गाठलेला तळ या सर्व मानवनिर्मित हस्तक्षेपाचा फटका, निसर्गचक्रात केलेला वारंवार बदल याची फार मोठी किंमत मानवी समाजासह जीवसृष्टीला भोगावी लागली आहे. याच संकटाचा धडा घेत राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षात सबंध राज्यभरात हिरव्या गालिच्यांचा संकल्प केला आहे. तब्बल २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३१ मेपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेशच सामाजिक वनीकरण व वनविभागाला दिले आहेत.पृथ्वीच्या घटकामध्ये, भूमी, जल, वायू, आकाश व प्रकाश (तेज) या नैसर्गिक संजीवक घटकांची शुध्दता व सजीव सृष्टीचे रक्षण करणे ही मानवी समाजाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या तत्वानुसारच भविष्यात मार्गक्रमणा करावी लागणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खासगी उद्योजक, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.यावर्षीचा पाऊस १०६ टक्के पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन कार्यक्रम जाहीर झाला आहे. वृक्षमहोत्सव काळात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाने संकल्प केलेल्या २ कोटी वृक्षलागवडीपैकी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वनविकास महामंडळ यांनी १ कोटी ५० लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे.