शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्र शासनाची मुद्रांक शुल्क व दंडासाठी अभय योजना, एक खिडकी सुविधा  सुरू

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2024 21:16 IST

सदानंद नाईक - उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर ...

सदानंद नाईक -

उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. तसेच मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सबरजिस्टर कार्यालयात एक खिडकी सुविधा सुरू केल्याची माहिती महापालिका सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी दिली आहे.

 महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार उल्हासनगर मधील इमारतीच्या सोसायटी रजिस्टर करणाऱ्या आणि विविध लाभ घेण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी अधिकारी व नागरीक यांची कार्यशाळा गेल्या महिन्यांत आयोजित केली होती. कार्यशाळेत नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालय जवळील सबरजिस्ट्रार कार्यालयात एक खिडकी सुविधा सुरू केली. शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन आपले अर्ज सदर ठिकाणी सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अजीज शेख व सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी केले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर