शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

सरकारी जमीन म्हणजे अक्षरश: बेवारस पोरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:55 IST

मीरा-भार्इंदरमध्ये सरकारी जमिनी म्हणजे जणू माय-बाप नसलेलं बेवारस पोरं झालं आहे. शासनाला आपल्या जमिनींचे संरक्षण करण्यात स्वारस्य नाही

मीरा-भार्इंदरमध्ये सरकारी जमिनी म्हणजे जणू माय-बाप नसलेलं बेवारस पोरं झालं आहे. शासनाला आपल्या जमिनींचे संरक्षण करण्यात स्वारस्य नाही. स्थानिक नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेला व या शहराचे विश्वस्त या नात्याने ज्यांची भूखंडाचे रक्षण करणे ही नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, अशा नगरसेवक, आमदार, खासदारांना तर सरकारी जमिनी प्रचंड आर्थिक व राजकीय मलिदा मिळवून देणारी दुभती गाय वाटत आहे. सरकारी जागा बळकावणाऱ्या माफियांनी झोपडी पासून आलिशान बंगले, हॉटेलं थाटली असताना कारवाई मात्र खानापूर्तीकरिता एखाददुसरीच केली जात आहे.मीरा भार्इंदर शहराच्या दोन्ही दिशांना खाडी व एका दिशेने समुद्र आणि राष्ट्रीय उद्यान आहे. शहराला मिळालेल्या या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वरदानामुळे विविध प्रकारचे पशु-पक्षी व जलचरांचे ही शहरे मोठे आश्रयस्थान आहे. जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील जमिनीची मालकी मुख्यत्वे राज्य व केंद्र शासनाकडे आहे. केंद्र शासनाचा मिठागरे विभाग तर राज्य शासनाचा महसूल विभाग यांच्याखेरीज महापालिका, आदिवासी व खाजगी मालकीची जमीन आहे.सरकारी जमिनीच्या संरक्षणासाठी पक्की भिंत उभारणे तर दूरच राहिले पण साध्या तारेचे कुंपण घालायलाही शासनाकडे निधी उपलब्ध नाही. सरकारी जमिनीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी नियमित गस्त घालत नाहीत.सरकारी जमिनीवर अतिक्रमण आढळल्यास लगेच पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. तलाठी, मंडळ अधिकाºयांची ही जबाबदारी आहे. परंतु तलाठ्यापासून जिल्हाधिकाºयांपर्यंत व मंत्रालयातील अधिकाºयांपासून मंत्र्यांपर्यंत कुणालाही सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचे सोयरसुतक नाही. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांकरिता बहुतांशी गुन्हे नोंदवले जात नाहीत.मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवााई न करणारे महापालिका प्रशासन या बेकायदा झोपडपट्ट्या, चाळी यांच्याकरिता रस्ते, पायवाटा, शौचालय, गटारे, दिवाबत्ती आदी सुविधा करुन देतात. स्वत:च्या मतपेट्या तयार करण्याच्या नादात एक दिवस इंचभरही सरकारी जमीन शिल्लक राहणार नाही.

धीरज परब, मीरा भार्इंदर