शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जमीन म्हणजे अक्षरश: बेवारस पोरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:55 IST

मीरा-भार्इंदरमध्ये सरकारी जमिनी म्हणजे जणू माय-बाप नसलेलं बेवारस पोरं झालं आहे. शासनाला आपल्या जमिनींचे संरक्षण करण्यात स्वारस्य नाही

मीरा-भार्इंदरमध्ये सरकारी जमिनी म्हणजे जणू माय-बाप नसलेलं बेवारस पोरं झालं आहे. शासनाला आपल्या जमिनींचे संरक्षण करण्यात स्वारस्य नाही. स्थानिक नियोजन प्राधिकरण असलेल्या महापालिकेला व या शहराचे विश्वस्त या नात्याने ज्यांची भूखंडाचे रक्षण करणे ही नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, अशा नगरसेवक, आमदार, खासदारांना तर सरकारी जमिनी प्रचंड आर्थिक व राजकीय मलिदा मिळवून देणारी दुभती गाय वाटत आहे. सरकारी जागा बळकावणाऱ्या माफियांनी झोपडी पासून आलिशान बंगले, हॉटेलं थाटली असताना कारवाई मात्र खानापूर्तीकरिता एखाददुसरीच केली जात आहे.मीरा भार्इंदर शहराच्या दोन्ही दिशांना खाडी व एका दिशेने समुद्र आणि राष्ट्रीय उद्यान आहे. शहराला मिळालेल्या या नैसर्गिक साधन संपत्तीच्या वरदानामुळे विविध प्रकारचे पशु-पक्षी व जलचरांचे ही शहरे मोठे आश्रयस्थान आहे. जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील जमिनीची मालकी मुख्यत्वे राज्य व केंद्र शासनाकडे आहे. केंद्र शासनाचा मिठागरे विभाग तर राज्य शासनाचा महसूल विभाग यांच्याखेरीज महापालिका, आदिवासी व खाजगी मालकीची जमीन आहे.सरकारी जमिनीच्या संरक्षणासाठी पक्की भिंत उभारणे तर दूरच राहिले पण साध्या तारेचे कुंपण घालायलाही शासनाकडे निधी उपलब्ध नाही. सरकारी जमिनीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी नियमित गस्त घालत नाहीत.सरकारी जमिनीवर अतिक्रमण आढळल्यास लगेच पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. तलाठी, मंडळ अधिकाºयांची ही जबाबदारी आहे. परंतु तलाठ्यापासून जिल्हाधिकाºयांपर्यंत व मंत्रालयातील अधिकाºयांपासून मंत्र्यांपर्यंत कुणालाही सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचे सोयरसुतक नाही. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांकरिता बहुतांशी गुन्हे नोंदवले जात नाहीत.मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवााई न करणारे महापालिका प्रशासन या बेकायदा झोपडपट्ट्या, चाळी यांच्याकरिता रस्ते, पायवाटा, शौचालय, गटारे, दिवाबत्ती आदी सुविधा करुन देतात. स्वत:च्या मतपेट्या तयार करण्याच्या नादात एक दिवस इंचभरही सरकारी जमीन शिल्लक राहणार नाही.

धीरज परब, मीरा भार्इंदर