शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा सरकारला विसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:52 IST

कल्याण-डोंबिवलीतील प्रश्न : गृहनिर्माणमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची मागणी

कल्याण : मध्य मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मात्र, केडीएमसी हद्दीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाविषयी काहीच निर्णय घेतलेला नाही. महापालिका सुरक्षितेतसाठी घरे रिकामी करण्याची सक्ती धोकादायक इमारतींमधील रहिवासांना करते. मात्र, इमारतींच्या पुनर्विकासाचा विचार केला जात नाही. त्यामुळे गृहनिर्माणमंत्र्यांनी या विषयी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा रहिवासी करत आहेत.

महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत आहे. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्लीतील मातृछाया धोकादायक इमारत पडून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी पाहणी तसेच मदतही जाहीर केलेली नाही. तसेच शहरातील अन्य धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठी योजनाही जाहीर केली नाही. मात्र, या इमारत दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीच तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका बजाविणारे विखे पाटील हे प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करून राज्य सरकारने मृत्यांच्या कुटुंबियांसह जखमींना मदत द्यावी. तसेच बेघर झालेल्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न विधिमंडळात मांडणार, असे आश्वासन ठाकुर्लीतील नागरिकांना दिले होते. मात्र, आता ही मागणी करणारे विखे पाटील हे आता सत्तेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृहनिर्माण खातेही आहे. विरोधात असताना त्यांनी त्यावेळी भाजप सरकारला लक्ष्य केले होते. आता त्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महापालिका हद्दीत २०१५ मध्ये ६५० इमारती या धोकादायक होत्या. आज २०१९ मध्ये महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार ४७३ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी २८२ इमारती या अतिधोकादायक आहेत. या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून नागरिकांना इमारत रिकामी करण्याची कारवाई केली जात आहे. महापालिका हद्दीत क्लस्टर योजना लागू केल्यावर या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. गेल्या चार वर्षांमध्ये तीन विधिमंडळ अधिवेशनात क्लस्टर योजना लागू करण्याचे आश्वासन सरकारकडून दिले गेले आहे. मात्र, त्याची पूर्तता केली जात नाही. एमएमआर क्षेत्रात महापालिका असल्याने या क्षेत्रासाठी सामाईक विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. परंतु, त्यास सरकारकडून अंतिम मंजुरी मिळत नाही तोपर्यंत महापालिका हद्दीतील क्लस्टरचा मार्ग मोकळा होणार नाही. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी निगडीत असलेल्या सामाईक विकास नियंत्रण नियमावलीस सरकार कधी मंजुरी देणार आहे, असा प्रश्नही विधिमंडळात उपस्थित केला गेला. परंतु, सरकारकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी असल्याचे सांगण्यात येते.सरकारला ३ सप्टेंबरपर्यंत मुदतडोंबिवली दत्तनगरातील राघवेंद्र सेवा संस्थेतर्फे सुनील नायक व महेश साळुंके यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठी योजना लागू करण्याची मागणी केली आहे. ही याचिका न्यायालयीन पटलावर सुनावणीसाठी आली असून, पहिल्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने त्यांचे म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यावर ३ सप्टेंबरपर्यंत सरकारला म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण