शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दिव्यांगांच्या निधीचा घोळ सुरुच, योग्य वापराचा सरकारचा दावा : मात्र निधी अन्यत्र वापरल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:49 IST

केडीएमसीने दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत तरतूद केलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे केला असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी

कल्याण : केडीएमसीने दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत तरतूद केलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे केला असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हा खुलासा केला आहे. दरम्यान, केडीएमसीने राज्य सरकारची दिशाभूल केली असल्याचा आरोप दिव्यांगांच्या समस्यांना वाचा फोडणारे दत्तात्रेय सांगळे यांनी केला आहे.दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांवर खर्च करावा, असे बंधन सरकारने घातले आहे. परंतु, त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे डोंबिवलीतील दिव्यांग सांगळे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात हे वास्तव उघड झाले. दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी अन्य कामांसाठी वापरल्याचा आरोप सांगळे यांचा आहे.दरम्यान, हा निधी कोणकोणत्या कामांसाठी वापरला, याची तपशीलवार माहिती आमदार शिंदे यांनी महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडे मागितली होती. तसेच याबाबतचा मुद्दा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता. शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्य सरकारचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नुकताच खुलासा करत संबंधित तरतूद केलेल्या निधीचा विनियोग दिव्यांगांकरिताच केल्याचा दावा केला आहे. केडीएमसीने सरकारला दिलेल्या अहवालानुसार २०१० ते २०१५ दरम्यान ६१ लाख ४६ हजार ३२६ रुपयांचा निधी दिव्यांगांकरिता खर्च झाल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शिंदे यांना पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.केडीएमसीकडून राज्य सरकारची दिशाभूल : संजयनगर परिसरात अंध दिव्यांगांची संख्या ५० टक्के आहे, याला दिव्यांग दत्तात्रेय सांगळे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारची केडीएमसीने दिशाभूल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच खर्च झालेल्या निधीबाबत राज्यमंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता त्यांना दिशााभूल करणारी माहिती पुरवली गेल्याचा सांगळे यांचा आरोप आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या तपशिलात हा खर्च झालेल्या निधीचा तपशील का दिलेला नाही, असा सवाल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार : शिंदेतरतूद केलेला निधी हा दिव्यांगांसाठीच वापरला असून त्यात दिव्यांगांची कोणत्याही प्रकारे अवहेलना झालेली नसल्याने याबाबत चौकशी करण्याचा तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्यमंत्री पाटील यांनी दिले असले तरी दिव्यांगांच्या भावना लक्षात घेता निधीच्या खर्चाचा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडणारअसल्याचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका