शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा पुरस्कार विकणे आहे: दिव्यांगाचा टाहो,पुनर्वसनासाठी पत्नी समवेत छेडले आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 20:51 IST

कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असताना पुनर्वसनाबाबत झालेल्या दुर्लक्षतेच्या निषेधार्थ मोहने येथील दिव्यांग शंकर साळवे आणि त्यांची पत्नी संगिता यांनी गुरूवारपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्दे अन्यथा ३ डिसेंबरला आत्मदहन

कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असताना पुनर्वसनाबाबत झालेल्या दुर्लक्षतेच्या निषेधार्थ मोहने येथील दिव्यांग शंकर साळवे आणि त्यांची पत्नी संगिता यांनी गुरूवारपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनापर्यंत पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करू असा इशाराही साळवे दाम्पत्यांनी दिला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना मिळालेला शासनाचा पुरस्कार शंकर साळवे यांनी महापालिकेच्या काराभाराच्या निषेधार्थ विक्रीला काढला आहे.दिव्यांग पुनर्वसन योजनेंतर्गत शासनाच्या वतीने देण्यात आलेले अधिकृत दुधकेंद्र केडीएमसीच्या अनधिकृत विरोधी पथकाने कोणतीही पुर्वसूचना न देता ५ डिसेंबर २०१५ ला तोडल्याचा आरोप शंकर साळवे यांचा आहे. दुधकेंद्र तोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहील्याने साळवे हे गेले दोन वर्षे महापालिका मुख्यालयात पाठपुरावा करीत आहेत. परंतू अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. २७ आॅक्टोबर २०१७ ला साळवे यांनी आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलनही छेडले असता आयुक्त पी वेलरासू यांनी साळवेंना दालनात बोलावून तीन आठवडयात तुमचे पुनर्वसन केले जाईल, ताबडतोब त्यांचे पुनर्वसन करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि उपायुक्त धनाजी तोरस्कर आणि अनिल लाड यांना दिले होते. १७ नोव्हेंबरला तीन आठवडयांचा कालावधी संपला परंतू पुनर्वसन न झाल्याने गुरूवारपासून ते ३ डिसेंबरपर्यंत आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. याउपरही न्याय मिळाला नाहीतर आत्मदहन करू असा पवित्रा साळवे दाम्पत्याने घेतला आहे. एकिकडे केडीएमसीने दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे केला नसताना दुसरीकडे एका दिव्यांगाच्या पुनर्वसनाबाबतीत झालेली हेळसांड पाहता महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. यासंदर्भात लोकमतने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली