शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

शासनाचा पुरस्कार विकणे आहे: दिव्यांगाचा टाहो,पुनर्वसनासाठी पत्नी समवेत छेडले आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 20:51 IST

कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असताना पुनर्वसनाबाबत झालेल्या दुर्लक्षतेच्या निषेधार्थ मोहने येथील दिव्यांग शंकर साळवे आणि त्यांची पत्नी संगिता यांनी गुरूवारपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्दे अन्यथा ३ डिसेंबरला आत्मदहन

कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असताना पुनर्वसनाबाबत झालेल्या दुर्लक्षतेच्या निषेधार्थ मोहने येथील दिव्यांग शंकर साळवे आणि त्यांची पत्नी संगिता यांनी गुरूवारपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनापर्यंत पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करू असा इशाराही साळवे दाम्पत्यांनी दिला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना मिळालेला शासनाचा पुरस्कार शंकर साळवे यांनी महापालिकेच्या काराभाराच्या निषेधार्थ विक्रीला काढला आहे.दिव्यांग पुनर्वसन योजनेंतर्गत शासनाच्या वतीने देण्यात आलेले अधिकृत दुधकेंद्र केडीएमसीच्या अनधिकृत विरोधी पथकाने कोणतीही पुर्वसूचना न देता ५ डिसेंबर २०१५ ला तोडल्याचा आरोप शंकर साळवे यांचा आहे. दुधकेंद्र तोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहील्याने साळवे हे गेले दोन वर्षे महापालिका मुख्यालयात पाठपुरावा करीत आहेत. परंतू अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. २७ आॅक्टोबर २०१७ ला साळवे यांनी आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलनही छेडले असता आयुक्त पी वेलरासू यांनी साळवेंना दालनात बोलावून तीन आठवडयात तुमचे पुनर्वसन केले जाईल, ताबडतोब त्यांचे पुनर्वसन करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि उपायुक्त धनाजी तोरस्कर आणि अनिल लाड यांना दिले होते. १७ नोव्हेंबरला तीन आठवडयांचा कालावधी संपला परंतू पुनर्वसन न झाल्याने गुरूवारपासून ते ३ डिसेंबरपर्यंत आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. याउपरही न्याय मिळाला नाहीतर आत्मदहन करू असा पवित्रा साळवे दाम्पत्याने घेतला आहे. एकिकडे केडीएमसीने दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे केला नसताना दुसरीकडे एका दिव्यांगाच्या पुनर्वसनाबाबतीत झालेली हेळसांड पाहता महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. यासंदर्भात लोकमतने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली