शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

गुगलने माणसाचा संयम संपवला आहे - डॉ तात्याराव लहाने

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 13, 2024 13:02 IST

मोबाईलमुळे आपल्या झोपेवर परिणाम होऊ लागला आहे. आपली झोप कमी झाली आहे. जी गोष्ट होणार नाही त्याची आपण काळजी करत असतो.

ठाणे : वाचनालय हे ज्ञानमंदिर आहे आणि ते पुढेही राहणार. वाचाल तर वाचाल ही जुनी म्हण आहे पण आता ही म्हण गांभीर्याने विचारात घेतली जात नाही. कारण आपल्यात बदल झाला आहे. आपली जाहा ही मोबाईलने घेतली आहे. आपल्याला काही हवे असेल तर आपण गुगलवर शोध घेतो. गुगलने माणसाचा संयम संपवला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावीत. दुर्दैवाने आपण पुस्तकापासून दूर जात आहोत अशी खंत ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली.

मोबाईलमुळे आपल्या झोपेवर परिणाम होऊ लागला आहे. आपली झोप कमी झाली आहे. जी गोष्ट होणार नाही त्याची आपण काळजी करत असतो. ताणतणावामुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. मेंदूच्या पेशी दिवसभरात दररोज वापरल्या जातात त्या झोपेतच रिकव्हर होतता. निद्रानाशमुळे लोकांना अल्झायमरसारखे आजार होऊ लागले आहेत. लोक विसरतात कारण त्यांना पुरेशी झोपच मिळत नाही. पुस्तक एक तास वाचले तरी गाढ झोप लागते. झोपून पुस्तक वाचून नको, बसूनच ते वाचले पाहिजे असा सल्ला डॉ. लहाने यांनी दिला. ५ टक्के मेंदूचा कॅन्सर हा मोबाईलमुळे तसेच छातीवर मोबाईल ठेवल्यामुळे हृदयाचे आजार होत असल्याचे वास्तव त्यांनी समोर मांडले.

व्हॉट्सॲपवर येणाऱ्या माहीतीची शहानिशा करण्याचा मोलाचा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. सहा वर्षापर्यंतच्या मुलाच्या हाता मोबाईल देणे घातक त्यामुळे त्याचा आयक्यू कमी होतो. मोबाईलचा कमीत कमी वापर केला आणि वाचनालयात जास्त वेळ घालवला तर मोबाईलमुळे होणारे आजार नक्कीच टाळता येतात. एकंदरीत सर्वांनीच वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे त्यांनी शेवटी नमूद केले.

ठाणे नगर वाचन मंदिर या संस्थेचे यंदा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी सुप्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ झाला. यावेळी संस्थाध्यक्ष केदार जोशी, कार्यवाह हेमंत दिवेकर, मोहिनी वैद्य, वीणा परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका प्रणाली नवघरे यांनी तर दिवेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

टॅग्स :thaneठाणे