शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाण्यात चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:34 IST

५० हजार अनुदान : तीन वर्षांत २८० जोडप्यांना आर्थिक साहाय्य

n  स्नेहा पावसकर     लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य व केंद्र शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेला ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील २८० जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून यंदाही कोरोनाचा प्रसार असला तरी सुमारे २०० नवे प्रस्ताव यासाठी आलेले आहेत.आंतरजातीय विवाह म्हटले की त्याला घरातून, समाजातून काही प्रमाणात का असेना विरोध होतो. पण जातीयता नष्ट करण्यासाठी ही योजना प्रोत्साहक ठरत आहे. या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागात अर्ज केल्यास प्रत्येक जोडप्यास ५० हजार इतके अनुदान दिले जाते, परंतु शासनाकडून येणारे हे अनुदान दोन वर्षांपूर्वी रखडले होते. मात्र पाठपुरावा केल्यावर ते अनुदान मिळाले.

पाठपुराव्यानेच मिळवले शासनाकडून अनुदानयोजनेला आता चांगला प्रतिसाद  मिळतो आहे. दोन वर्षांपूर्वी येणारे आर्थिक सहाय्य शासनाकडूनच मिळत नव्हते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून ते अनुदान मिळाले व रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले. 1    - रमेश अवचार,     जिल्हा समाज कल्याण अधिकारी,ठाणे.

याेजनेचा लाभ कोणाला?आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहित जोडप्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. या जोडप्यापैकी एक व्यक्ती सवर्ण व एक मागासवर्गीय असणे आवश्यक आहे. त्यांनाच आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेच्या सवलती मिळतात. ही योजना अ.जा, अ.ज, वि.ज, भ.ज या आंतरप्रवर्गातील आंतरजातीयांना लागू होते. या जोडप्याला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.