शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’ नावाची सोन्याची द्वारका अक्षरश: बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

कल्याण : सोन्याची द्वारका आपण पौराणिक कथा, पोथ्यापुराणात वाचली आहे. मात्र, एनआरसी कंपनी व कॉलनीत द्वारकेइतकीच सुबत्ता नव्वदच्या दशकात ...

कल्याण : सोन्याची द्वारका आपण पौराणिक कथा, पोथ्यापुराणात वाचली आहे. मात्र, एनआरसी कंपनी व कॉलनीत द्वारकेइतकीच सुबत्ता नव्वदच्या दशकात होती. कामगारांना उच्च प्रतीचे दूध मिळावे याकरिता मालकाने गायी-म्हशी पाळल्या होत्या व डेअरी टाकली होती. कॅन्टीनमध्ये ६० पैशात राइसप्लेट, एक रुपयात मांसाहार, १० पैशात नाश्ता वर्षानुवर्षे मिळत होता. महिन्याकाठी केवळ दोन रुपये भरून क्लब हाऊसमध्ये टेनिसपासून बिलियर्डपर्यंत सारे खेळ खेळता येत होते. इंग्रजी- मराठी, गुजराती माध्यमाची शाळा, मोफत हॉस्पिटल, घसघशीत पगार आणि बोनस, अशी सगळी सुखे या कॉलनीत पायाशी लोळत होती. एकेकाळी अनेकांनी रेल्वेची सरकारी नोकरी नाकारून एनआरसीची नोकरी पत्करण्यामागे याच सोयी-सुविधांचे आमिष होते; परंतु जशी द्वारका बुडाली, तशी एनआरसी बुडाली आणि आज उरली विपन्नता आणि रिकाम्या पोटी सुरू असलेला विलाप.

आंबिवली मोहनेनजीक ४४० एकर जागेवर रसिकलाल चिनॉय यांनी १९४६ साली एनआरसी कंपनीची पायाभरणी केली. कंपनीची उभारणी करण्यास चार वर्षे लागली. १९५० साली कंपनीत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. कंपनीत कापडासाठी धागा तयार केला जात होता. रेयॉन, टायर कोट आणि त्यानंतर नायलॉन तयार होऊ लागले. सुरुवातीला केवळ पाच टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्यावेळी कंपनीत एक हजार कामगार होते. कंपनी २००९ मध्ये बंद करण्यात आली. त्यावेळी कंपनीत ४० टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्याचबरोबर बारा प्रकारचे बायप्रॉडक्टस्‌ होते. कंपनी बंद पडली तेव्हा कंत्राटी व कायम मिळून ४,५०० कामगार होते. चिनॉयकडून ही कंपनी कापडिया यांनी घेतली. त्यानंतर जी.पी. गोयंका यांनी घेतली. कंपनी बंद पडली तेव्हा गोयंका यांचे व्यवस्थापन होते.

कंपनी उत्पादनाकरिता कच्चा माल म्हणून लगदा लागत होता. हा लगदा बांबूपासून तयार होतो. त्याकरिता कंपनीने ३५ एकर जागेवर बांबू प्लॉट विकसित केला होता. त्यात बांबूची शेती केली जात होती. आजही तो परिसर बांबू प्लॉट म्हणून ओळखला जातो. लगद्यासाठी लागणारा कागद हा केरळमधून मागविला जात होता.

कंपनीच्या कामगारांकरिता कामगार वसाहत उभारली होती. त्यात किमान ८०० कामगार आणि अधिकारी राहत होते. अधिकाऱ्यांकरिता बंगलेवजा घरे होती. कामगारांच्या मुलांकरिता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा ही इंग्रजी, मराठी आणि गुजराती माध्यमाची होती. आजही शाळेची इमारत उभी असून, शाळा सुरू आहे. कंपनीच्या क्लब हाऊसमध्ये महिन्याकाठी पासकरिता दोन रुपये मोजावे लागत होते. त्यात इनडोअर गेममध्ये टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, बिलियर्ड, पत्ते, कॅरम आदी खेळाच्या सुविधा होत्या. त्याचबरोबर कामगारांसाठी सुसज्ज ६० खाटांचे रुग्णालय होते. मुंबईतील शिवडी सोडले, तर टीबी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष केवळ येथे होता. कंपनीच्या भल्यामोठ्या कॅन्टीनमध्ये एकाचवेळी ६०० पेक्षा जास्त कामगार जेवण घेत. अत्यंत कमी दरात येथे जेवण, नाश्ता मिळायचा. रेशनिंगकरिता ग्राहक सोसायटी व गॅस एजन्सी होती. कंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा बोनस झाला की, कंपनी परिसरातील दुकानदारांची ‘दिवाळी’ होत असे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीला घरघर लागली आणि ही सोन्याची द्वारका बुडाली.

-----------------