शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

उल्हासनगरला देवही वाचवू शकत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:31 IST

नगरसेवकांच्या असहकार्यामुळे उल्हासनगर पालिका डबघाईला आली. अशीच परिस्थिती राहिल्यास या शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंगळवारच्या महासभा तहकुबीनंतर व्यक्त केली

उल्हासनगर : नगरसेवकांच्या असहकार्यामुळे उल्हासनगर पालिका डबघाईला आली. अशीच परिस्थिती राहिल्यास या शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंगळवारच्या महासभा तहकुबीनंतर व्यक्त केली. यापुढे उल्हासनगरात आयुक्त म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पालिकेच्या चांगल्या कामाला नगरसेवक सहकार्य करीत नाही. त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता अभियानासह विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींचे हितसंबध दुखावल्याने त्यांनी विरोध सुरू केला. नगरसेवकांच्या असहकार्यामुळे आयुक्तपदी राहण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे. कोणतेही काम हाती घेताना तिजोरीचा ‘सल्ला’ आधी घ्यावा लागतो. नगरसेवक करवाढीला विरोध करतात. मग खर्च भागविण्यासाठी पैसे येतील कुठून? असा प्रश्नही आयुक्तांनी केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेला मुलभूत सेवाही पुरवता येणार नाहीत. अशा पालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याची आता इच्छाच राहिली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. अधिकाºयांची ७० टक्के, तर ३० ते ३५ टक्के इतर पदे रिक्त आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी दिले जात नाही. कनिष्ठ कर्मचाºयांवर प्रभारी पदभार देऊन कामे करून घेतली जात आहेत. त्यांचा परिणाम पालिकेच्या कामावर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.सत्ताधाºयांतीलवादाचा फटकाउल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी पक्षातील भाजपा, त्यातील दोन गट, ओमी टीम आणि साई पक्षातील वाद चव्हाट्यावर येत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. या पक्षांत परस्परांत ताळमेळ नसल्याने महापालिका प्रशासनावरील त्यांची पकड निसटली आहे. नगरसेवकांची लहानसहानही कामे होत नसल्याने बहुतांश नगरसेवक नाराज झाले असून त्यांनी आयुक्तांना टार्गेट केले आहे.गेल्या महासभेत सत्ताधाºयांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त हुकूमशहा झाल्याचा आरोप करून त्यांना अधिकाराचे विक्रेंद्रीकरण करण्याचा सल्ला दिला. आयुक्त आणि अधिकाºयांच्या गैरहजरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत महासभा स्थगित केली.स्वच्छता अभियानांतर्गत उपभोक्ता कर लावण्याचा प्रस्तावासाठी मंगळवारी विशेष महासभा झाली. मात्र नगरसेवकांनी मुख्य प्रश्नाला हात न घालता पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत आयुक्तांसह पालिका अधिकाºयांची कोंडी केली. पाणीप्रश्न सुटेपर्यंत महासभा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर आयुक्तांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे आयुक्त प्रचंड नाराज झाले.