शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अन्य समाजांना आरक्षण दिल्याने आमच्या वाटणीत फरक पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता ...

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. मराठा, मुस्लीम, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण मिळावे. त्यांना आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणाच्या वाट्यात कुठेही फरक पडत नाही, अशी भूमिका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी मांडली आहे.

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त ढोबळे यांची ५० कार्यकर्त्यांसह १८ जुलैपासून नवनिर्धार संवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे. नंदुरबारपासून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान त्यांनी २८ जिल्ह्यांतील मातंग वस्त्यांवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. या यात्रेचा समारोप घाटकोपरच्या चिरागनगर येथे ५ सप्टेंबरला होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी कल्याणमध्ये दाखल झाली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी ॲड. कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, प्रा. गिरीश लटके, बाबा रामटेके आदी उपस्थित होते.

ढोबळे म्हणाले, अ, ब, क आणि ड या प्रमाणे आरक्षण द्यावे. ‘अ’ गटात बौद्ध समाज, ‘ब’ गटात मातंग समाज, ‘क’ गटात होलार, चर्मकार, ढोर या जातींचा समावेश करावा आणि ‘ड’ गटात अन्य ६९ जातींचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, तिचा विचार होत नाही. हीच मागणी एखाद्या साखर संघाने केली, तर ती लगेच मान्य केली जाते. साखर संघाची मागणी मान्य केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, आमची मागणी पूर्ण केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. लहान समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी या यात्रेतून जनजागृती करण्यात आली आहे. वाडी-वस्त्यांवरील शिक्षणाला चालना मिळावी, याकडे ढोबळे यांनी लक्ष वेधले आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या ॲड. कोमल साळुंखे यांनी जाहीर निषेध केला. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना चांगली अद्दल घडविली जावी. शहरातील महिला अधिकारी सुरक्षित नसेल, तर गाव-खेड्यांतील बाईच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल त्यांनी केला.

--------