शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अन्य समाजांना आरक्षण दिल्याने आमच्या वाटणीत फरक पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता ...

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. मराठा, मुस्लीम, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण मिळावे. त्यांना आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणाच्या वाट्यात कुठेही फरक पडत नाही, अशी भूमिका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी मांडली आहे.

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त ढोबळे यांची ५० कार्यकर्त्यांसह १८ जुलैपासून नवनिर्धार संवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे. नंदुरबारपासून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान त्यांनी २८ जिल्ह्यांतील मातंग वस्त्यांवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. या यात्रेचा समारोप घाटकोपरच्या चिरागनगर येथे ५ सप्टेंबरला होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी कल्याणमध्ये दाखल झाली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी ॲड. कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, प्रा. गिरीश लटके, बाबा रामटेके आदी उपस्थित होते.

ढोबळे म्हणाले, अ, ब, क आणि ड या प्रमाणे आरक्षण द्यावे. ‘अ’ गटात बौद्ध समाज, ‘ब’ गटात मातंग समाज, ‘क’ गटात होलार, चर्मकार, ढोर या जातींचा समावेश करावा आणि ‘ड’ गटात अन्य ६९ जातींचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, तिचा विचार होत नाही. हीच मागणी एखाद्या साखर संघाने केली, तर ती लगेच मान्य केली जाते. साखर संघाची मागणी मान्य केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, आमची मागणी पूर्ण केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. लहान समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी या यात्रेतून जनजागृती करण्यात आली आहे. वाडी-वस्त्यांवरील शिक्षणाला चालना मिळावी, याकडे ढोबळे यांनी लक्ष वेधले आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या ॲड. कोमल साळुंखे यांनी जाहीर निषेध केला. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना चांगली अद्दल घडविली जावी. शहरातील महिला अधिकारी सुरक्षित नसेल, तर गाव-खेड्यांतील बाईच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल त्यांनी केला.

--------