शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

पाणीयोजनेसाठी जागा देणार

By admin | Updated: June 1, 2017 05:12 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिका पाणीयोजना राबवत आहे. त्यासाठी लागणारी जागा देण्यास एमआयडीसी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिका पाणीयोजना राबवत आहे. त्यासाठी लागणारी जागा देण्यास एमआयडीसी तयार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले. तसेच ‘लोढा हेवन’, ‘रिजन्सी’, ‘देशमुख होम्स’ या गृहसंकुलांमधील हजारो रहिवाशांना महापालिकेच्याच दराने पाणीपुरवठा करण्याबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.२७ गावांमधील विविध प्रश्नांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर हे पाठपुरावा करत होते. त्यासंदर्भात देसाई यांनी नुकतीच मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेतली. या वेळी २७ गावांमधील एमआयडीसीशी संबंधित पाणीपुरवठा आणि बांधकामे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. डोंबिवली औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र . २ मधील भूखंड क्र . ओएस-५ या भूखंडांवरील बांधकामे काढण्याबाबत एमआयडीसीने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, ही बांधकामे पूर्वापार आहेत. जमीन भूसंपादनातून वगळण्याचे आदेश उल्हास खोरे प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले होते. ही बाब डॉ. शिंदे यांनी देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यावर आधारित प्रस्ताव तयार करून जमिनी वगळण्याबाबत किंवा काही प्रीमिअम आकारून ही बांधकामे नियमित करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची ग्वाही देसाई यांनी दिली. चर्चेत अनेक समस्या मार्गी लागल्याचा दावा डॉ. शिंदे यांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या काही बांधकामांना नियमित करण्याबाबत अथवा त्या जमिनी डिनोटिफाय करण्याबाबत निर्णय घेण्याचे देसाई यांनी मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली. लोढा हेवन, रिजन्सी, देशमुख होम्स आदी गृहसंकुलांमधील रहिवाशांना महापालिकेच्या तुलनेत एमआयडीसीकडून जादा दराने पाणीपुरवठा होत असल्याकडेही डॉ. शिंदे यांनी या वेळी लक्ष वेधले. हा परिसर आता केडीएमसीच्या हद्दीत आल्यामुळे या रहिवाशांना महापालिकेच्याच दराने पाणी देण्याची मागणी डॉ. शिंदे यांनी केली. त्यावर, एकाच हद्दीत असलेल्या दोन ग्राहकांना वेगवेगळ्या दराने पाणीपुरवठा करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देसाई यांनी दिली. याचबरोबर आजदे परिसरातील बाधित गाळ्यांचा क्लस्टरच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याबाबतच्या पर्यायाचाही विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.