शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांकडून चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात घेऊन, रेडीरेकनरनुसार चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील सादर करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना केल्या. त्याबाबतच्या पुराव्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जादा दर मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

कल्याण - कसारा रेल्वेमार्गाचे भूसंपादन, कांदळवन जाहीर करण्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, बुलेट ट्रेनसाठी रखडलेले भूसंपादन, मुंबई-वडोदरा महामार्गाचे भूसंपादन आदींबाबत पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन बाळगून विकासाची कामे रखडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी शहापूर तालुक्यातील काही भागात केवळ सव्वालाख रुपये गुंठा हा शासकीय दर ठरविण्यात आला. तर, या भागात एका खासगी कंपनीने चार लाख रुपये गुंठा दराने जमीन खरेदी केल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच पाटील यांनी तत्काळ जादा दराने जमिनीच्या नोंदणी व्यवहाराचा तपशील देण्याची सूचना केली. याबाबत शेतकऱ्यांनी तपशील दिल्यावर या भागातील जमीन मोबदल्याचे वाढीव दर निश्चित करावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात ते रखडल्याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार वाढीव दर देण्याच्या सूचना बुलेट ट्रेन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

‘कांदळवनांबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही’

- भिवंडी तालुक्यातील केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केली आहेत. कोणत्याही शेतकऱ्याच्या खासगी जमिनीवर कांदळवने जाहीर झालेली नाहीत, असा खुलासा कांदळवन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपयोगाच्या जागा वगळल्या असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

- दिवे अंजूर येथे एकेकाळी खारजमीन व शेतीत विभागणी एका बांधाने करण्यात आली. कालांतराने तो रस्ता झाला. मात्र, त्यावर आता कांदळवन जाहीर करण्यात आले. सारंगपाडा येथील पारंपरिक स्मशानभूमी कांदळवनाच्या नावाखाली तडकाफडकी बंद करण्यात आली. या प्रकाराबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कांदळवनाची नोंद केल्या असल्याच्या तक्रारी आहेत, असे पाटील म्हणाले. त्यावर केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रेड्डी यांनी वनसंवर्धन अधिनियम अन्वये सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागा वगळण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले.

--