शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात घेऊन, रेडीरेकनरनुसार चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील सादर करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना केल्या. त्याबाबतच्या पुराव्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जादा दर मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

कल्याण - कसारा रेल्वेमार्गाचे भूसंपादन, कांदळवन जाहीर करण्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, बुलेट ट्रेनसाठी रखडलेले भूसंपादन, मुंबई-वडोदरा महामार्गाचे भूसंपादन आदींबाबत पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन बाळगून विकासाची कामे रखडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी शहापूर तालुक्यातील काही भागात केवळ सव्वालाख रुपये गुंठा हा शासकीय दर ठरविण्यात आला. तर, या भागात एका खासगी कंपनीने चार लाख रुपये गुंठा दराने जमीन खरेदी केल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच पाटील यांनी तत्काळ जादा दराने जमिनीच्या नोंदणी व्यवहाराचा तपशील देण्याची सूचना केली. याबाबत शेतकऱ्यांनी तपशील दिल्यावर या भागातील जमीन मोबदल्याचे वाढीव दर निश्चित करावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात ते रखडल्याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार वाढीव दर देण्याच्या सूचना बुलेट ट्रेन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

‘कांदळवनांबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही’

- भिवंडी तालुक्यातील केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केली आहेत. कोणत्याही शेतकऱ्याच्या खासगी जमिनीवर कांदळवने जाहीर झालेली नाहीत, असा खुलासा कांदळवन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपयोगाच्या जागा वगळल्या असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

- दिवे अंजूर येथे एकेकाळी खारजमीन व शेतीत विभागणी एका बांधाने करण्यात आली. कालांतराने तो रस्ता झाला. मात्र, त्यावर आता कांदळवन जाहीर करण्यात आले. सारंगपाडा येथील पारंपरिक स्मशानभूमी कांदळवनाच्या नावाखाली तडकाफडकी बंद करण्यात आली. या प्रकाराबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कांदळवनाची नोंद केल्या असल्याच्या तक्रारी आहेत, असे पाटील म्हणाले. त्यावर केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रेड्डी यांनी वनसंवर्धन अधिनियम अन्वये सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागा वगळण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले.

--