शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण ते कसारादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रखडलेल्या भूसंपादनासंदर्भात बाधित शेतकऱ्यांकडून जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा आग्रह लक्षात घेऊन, रेडीरेकनरनुसार चार लाख रुपये गुंठा दराने झालेल्या जमीन व्यवहाराचा तपशील सादर करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना केल्या. त्याबाबतच्या पुराव्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जादा दर मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

कल्याण - कसारा रेल्वेमार्गाचे भूसंपादन, कांदळवन जाहीर करण्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, बुलेट ट्रेनसाठी रखडलेले भूसंपादन, मुंबई-वडोदरा महामार्गाचे भूसंपादन आदींबाबत पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन बाळगून विकासाची कामे रखडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी शहापूर तालुक्यातील काही भागात केवळ सव्वालाख रुपये गुंठा हा शासकीय दर ठरविण्यात आला. तर, या भागात एका खासगी कंपनीने चार लाख रुपये गुंठा दराने जमीन खरेदी केल्याची बाब काही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच पाटील यांनी तत्काळ जादा दराने जमिनीच्या नोंदणी व्यवहाराचा तपशील देण्याची सूचना केली. याबाबत शेतकऱ्यांनी तपशील दिल्यावर या भागातील जमीन मोबदल्याचे वाढीव दर निश्चित करावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात ते रखडल्याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार वाढीव दर देण्याच्या सूचना बुलेट ट्रेन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

‘कांदळवनांबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही’

- भिवंडी तालुक्यातील केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केली आहेत. कोणत्याही शेतकऱ्याच्या खासगी जमिनीवर कांदळवने जाहीर झालेली नाहीत, असा खुलासा कांदळवन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उपयोगाच्या जागा वगळल्या असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

- दिवे अंजूर येथे एकेकाळी खारजमीन व शेतीत विभागणी एका बांधाने करण्यात आली. कालांतराने तो रस्ता झाला. मात्र, त्यावर आता कांदळवन जाहीर करण्यात आले. सारंगपाडा येथील पारंपरिक स्मशानभूमी कांदळवनाच्या नावाखाली तडकाफडकी बंद करण्यात आली. या प्रकाराबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कांदळवनाची नोंद केल्या असल्याच्या तक्रारी आहेत, असे पाटील म्हणाले. त्यावर केवळ सरकारी जमिनीवरच कांदळवने जाहीर केल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रेड्डी यांनी वनसंवर्धन अधिनियम अन्वये सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागा वगळण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले.

--