शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण ...

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर चार महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. खड्डे बुजविले जात नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरिकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. सातव्या वेतन आयोगानुसार पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील, तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरिकांच्या उपचाराकरिता मिळावे. ज्या तत्परतेने महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, तेवढी तत्परता काम पूर्ण करण्यात दाखविली नाही, असे ते म्हणाले.

पैसा नक्की कुठे खर्च केला जातो?

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आता नवरात्र येईल. त्यानंतर दिवाळी आहे. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या खिशात घातला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतापुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का, असा प्रश्न या संस्थेने केला आहे.

--------------------------