शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण ...

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर चार महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. खड्डे बुजविले जात नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरिकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. सातव्या वेतन आयोगानुसार पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील, तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरिकांच्या उपचाराकरिता मिळावे. ज्या तत्परतेने महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, तेवढी तत्परता काम पूर्ण करण्यात दाखविली नाही, असे ते म्हणाले.

पैसा नक्की कुठे खर्च केला जातो?

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आता नवरात्र येईल. त्यानंतर दिवाळी आहे. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या खिशात घातला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतापुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का, असा प्रश्न या संस्थेने केला आहे.

--------------------------