शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भारतरत्न पुरस्कार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण ...

कल्याण : पश्चिमेतील भोईर चौक ते उंबर्डे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कंबरतोड प्रवास करीत मार्गक्रमण करावे लागत आहे. हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची उपरोधिक मागणी कल्याण विकासिनी या सामाजिक संस्थेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. उदय रसाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. भोईर चौक ते उंबर्डे या रस्त्यावर चार महिन्यांपासून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. खड्डे बुजविले जात नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या सहनशील नागरिकांना महापालिकेने उपचारासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. सातव्या वेतन आयोगानुसार पगार लाटणारे अधिकारी नागरिकांच्या हिताची कामे करण्यास असमर्थ ठरत असतील, तर त्यांचे सानुग्रह अनुदान नागरिकांच्या उपचाराकरिता मिळावे. ज्या तत्परतेने महापालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, तेवढी तत्परता काम पूर्ण करण्यात दाखविली नाही, असे ते म्हणाले.

पैसा नक्की कुठे खर्च केला जातो?

गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून झाले. आता नवरात्र येईल. त्यानंतर दिवाळी आहे. यंदा जवळपास १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो. केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या खिशात घातला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी, कंत्राटदार यांच्या संगनमतापुढे आयुक्तही हतबल झाले आहेत का, असा प्रश्न या संस्थेने केला आहे.

--------------------------