शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उल्हासनगर महापालिका ठेक्यावर देण्यासाठी शासनाला प्रस्ताव द्या, ठाकरे गटाची मागणी

By सदानंद नाईक | Updated: April 28, 2023 19:38 IST

महापालिकेच्या सुरक्षा विभाग, अग्निशमन विभागात ९० टक्के पदे रिक्त असल्याने, दोन्ही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली.

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील कोट्यवधीच्या विकास कामावर देखरेखीसाठी पुरेशा अधिकारी वर्ग, अभियंता नसल्याने, महापालिका ठेकेदारामार्फत चालविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्याचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी आयुक्तांना देऊन महापालिका कारभाराचे वाभाळे काढले. 

उल्हासनगर महापालिकेने प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण यापूर्वीच केले असून त्याचा कित्ता गिरविण्यात येत असल्याचा आरोप शहरातून होत आहे. शहरातील कोट्यावधीच्या विकास कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडे अभियंता नसल्याने, कंत्राटी अभियंता घेण्याची वेळ आल्याची टीका बोडारे यांनी केली. दोन उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, अग्निशमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विधुत विभाग, करनिर्धारक संकलक, विधी अधिकारी, महापालिका सचिव, वैधकीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, नगररचनाकार संचालक यांच्यासह बहुतांश अभियंताचें पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांचे ७० तर कर्मचाऱ्यांचे ४० टक्के पदे रिक्त असणाऱ्या महापालिकेला कारभार कंत्राटी अभियंता व कर्मचारी यांच्या हातात जाण्याची भीती बोडारे यांनी व्यक्त करून होत असलेल्या विकास कामावर प्रश्नचिन्हे उपस्थित केला.

महापालिकेच्या सुरक्षा विभाग, अग्निशमन विभागात ९० टक्के पदे रिक्त असल्याने, दोन्ही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली. दुसरीकडे पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, विधुत विभागासह इतर विभागात हजारो कोटीचे विकास कामे सुरू आहेत. मात्र त्यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडे अभियंते नसल्याने, विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहेत. महापालिका अभियंतेची ९० टक्के पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अभियंतेचे ठेकेदार, महापालिका अधिकारी व राजकीय नेते ऐकणार का? असा प्रश्न बोडारे यांनी केला. सर्वच विभागात कंत्राटी कामगार घेतले जात असल्याने, महापालिकेची वाटचाल खाजगीकरणाकडे सुरू आहे. प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे यापूर्वीच खाजगीकरण केले असून महापालिका ठेक्यावर द्या, असे शासनाला निवेदन देण्याची मागणी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे बोडारे यांनी केली. 

हजारो कोटींची विकास कामे कोणासाठी?महापालिका विकास कामचें उदघाटन व लोकार्पण करण्यासाठी यापूर्वी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यात १२६१ कोटी रुपये शहर विकास कामासाठी दिल्याचे सांगितले. मग त्यावर देखरेख करण्यासाठी महापालिका अधिकारी व अभियंते नको का? असा प्रश्न बोडारे यांनी केला आहे.