शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:47 IST

यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८४.९५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.७८ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. यात ३४,५४४ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहिर झाला. जिल्ह्यातून यंदा ८९,९२४ विद्यार्थी परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ७९,७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३९,६६१ मुली असून ४०,०७७ मुलांचा समावेश आहे.जिल्ह्याच्या एकूण निकालात ८३५९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळविण्यात यश आले असून २६,१८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३८,९५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली असून ६२३८ विद्यार्थ्यांना पास क्लासवर समाधान मानावे लागले आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ४५.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी रिपिटर्सचा निकाल ३९.५८ टक्के असल्याने यंदा त्यात झालेली वाढ समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.शहरातील १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागांतील निकालाची टक्केवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यंदा कलाशाखेची टक्केवारी घसरलीशाखांनुसार निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.८९ टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के आहे. कला शाखेच्या निकालात यंदा घसरण झाली असून ७८.५३ टक्के निकालाची नोंद झाली आहे. व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.४९ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेत २७,१२८ विद्यार्थ्यांपैकी २५,१९८ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतून ४६,४१९ विद्यार्थी बसले होते पैकी ४१,५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरली आहे. भिवंडी आघाडीवरकल्याण-डोंबिवली परिसरातील २०१२६ विद्यार्थ्यांपैकी १७,४४५ (८६.६८ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भिवंडी परिसरात सर्वाधिक ९०.११ टक्के निकाल लागला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण यांसारख्या ग्रामीण भागांचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास आहे.