शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:47 IST

यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८४.९५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.७८ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. यात ३४,५४४ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहिर झाला. जिल्ह्यातून यंदा ८९,९२४ विद्यार्थी परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ७९,७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३९,६६१ मुली असून ४०,०७७ मुलांचा समावेश आहे.जिल्ह्याच्या एकूण निकालात ८३५९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळविण्यात यश आले असून २६,१८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३८,९५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली असून ६२३८ विद्यार्थ्यांना पास क्लासवर समाधान मानावे लागले आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ४५.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी रिपिटर्सचा निकाल ३९.५८ टक्के असल्याने यंदा त्यात झालेली वाढ समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.शहरातील १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागांतील निकालाची टक्केवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यंदा कलाशाखेची टक्केवारी घसरलीशाखांनुसार निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.८९ टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के आहे. कला शाखेच्या निकालात यंदा घसरण झाली असून ७८.५३ टक्के निकालाची नोंद झाली आहे. व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.४९ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेत २७,१२८ विद्यार्थ्यांपैकी २५,१९८ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतून ४६,४१९ विद्यार्थी बसले होते पैकी ४१,५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरली आहे. भिवंडी आघाडीवरकल्याण-डोंबिवली परिसरातील २०१२६ विद्यार्थ्यांपैकी १७,४४५ (८६.६८ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भिवंडी परिसरात सर्वाधिक ९०.११ टक्के निकाल लागला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण यांसारख्या ग्रामीण भागांचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास आहे.