शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 31, 2017 05:47 IST

यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८४.९५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.७८ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. यात ३४,५४४ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहिर झाला. जिल्ह्यातून यंदा ८९,९२४ विद्यार्थी परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ७९,७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३९,६६१ मुली असून ४०,०७७ मुलांचा समावेश आहे.जिल्ह्याच्या एकूण निकालात ८३५९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळविण्यात यश आले असून २६,१८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३८,९५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली असून ६२३८ विद्यार्थ्यांना पास क्लासवर समाधान मानावे लागले आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ४५.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी रिपिटर्सचा निकाल ३९.५८ टक्के असल्याने यंदा त्यात झालेली वाढ समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.शहरातील १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागांतील निकालाची टक्केवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यंदा कलाशाखेची टक्केवारी घसरलीशाखांनुसार निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.८९ टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के आहे. कला शाखेच्या निकालात यंदा घसरण झाली असून ७८.५३ टक्के निकालाची नोंद झाली आहे. व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.४९ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेत २७,१२८ विद्यार्थ्यांपैकी २५,१९८ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतून ४६,४१९ विद्यार्थी बसले होते पैकी ४१,५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरली आहे. भिवंडी आघाडीवरकल्याण-डोंबिवली परिसरातील २०१२६ विद्यार्थ्यांपैकी १७,४४५ (८६.६८ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भिवंडी परिसरात सर्वाधिक ९०.११ टक्के निकाल लागला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण यांसारख्या ग्रामीण भागांचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास आहे.