शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

घाडीगावकरांची भाजपाला सोडचिठ्ठी

By admin | Updated: February 3, 2017 02:06 IST

चार महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून पक्षात दाखल झालेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून भाजपाला सोडचिठ्ठी दिली

ठाणे : चार महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून पक्षात दाखल झालेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासमवेत अपक्ष नगरसेविका स्वाती देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील भाजपा सोडली असून आता घाडीगावकर हे चार पॅनलमधून १६ उमेदवार उभे करणार आहेत. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीवर राजकीय आर्थिक हितसंबंध जपल्याचे आरोप केले आहेत.काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून घाडीगावकर यांनी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर, त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून स्वाती देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्या या निवडणुकीत विजयी झाल्या. चार महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर, वागळे पट्ट्याची संपूर्ण जबाबदारीही त्यांना देण्यात आली होती. येथील उमेदवार ठरवण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले होते. असे असतानादेखील भाजपाने आता उमेदवारांची जी संभाव्य यादी जाहीर केली, त्यात केवळ पाचजणांनाच संधी दिली. त्या ठिकाणी इतर जे उमेदवार देण्यात आले, ते अतिशय कमकुवत दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती प्रभागातच राहत नाहीत त्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या चारही पॅनलमध्ये कमकुवत उमेदवार देऊन भाजपाने इतर पक्षांबरोबर आपले आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.तिकीट मागितले नसतानाही केवळ माझी मनधरणी करून इतर ठिकाणी आपले हितसंबंध जपण्याचा स्थानिक भाजपाकडून प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले. यामुळेच आपण भाजपाला सोडचिठ्ठी देत असून प्रभाग क्र. १५, १६, १७, १८ आणि १९ मध्ये मी अपक्ष उमेदवार देणार असून स्वत:ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. माझ्या वाटेत कोणी राजकीय मंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लुडबुड केल्यास सर्वांचे प्रत्येक आठवड्याला वस्त्रहरण केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या ग्रंथाची एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी) - दरम्यान, अचानक आक्रमक होऊन अशा पद्धतीने त्यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वावर घणाघाती आरोप केल्याने पक्ष आता वागळे पट्ट्यात बॅकफुटवर जाणार असल्याचे चित्र आहे. घाडीगावकर यांच्या निमित्ताने शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शिरकाव करण्याची मोठी संधी भाजपाला होती. परंतु, ती संधी पक्षाने गमावली आहे.घाडीगावकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर याचा फायदा उचलण्यासाठी मनसेने त्यांना प्रवेशाची आॅफर दिली आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.