शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

त्याग आणि मूल्यांच्या भाषेला तरुणांची पिढी कंटाळली

By admin | Updated: May 23, 2017 01:41 IST

आपण आजच्या तरुण पिढीला खूप मूल्ये देतो, असे आधीच्या पिढीला वाटते. पण त्या पिढीच्या त्यागाच्या आणि मूल्यांच्या भाषेला आताची पिढी कंटाळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपण आजच्या तरुण पिढीला खूप मूल्ये देतो, असे आधीच्या पिढीला वाटते. पण त्या पिढीच्या त्यागाच्या आणि मूल्यांच्या भाषेला आताची पिढी कंटाळली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संवादाची भाषा व मुद्दे बदलणे आवश्यक आहे, असे परखड मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. ‘वुई नीड यू सोसायटी’तर्फे शनिवारी पेशवे सभागृहात ‘वसा, वारसा आणि भरवसा’ हा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. नाडकर्णी, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, नगर येथे स्नेहालय संस्था उभारणारे, समाजात नाईलाजाने व परंपरेने शरीरविक्र य कराव्या लागणाऱ्या महिलांच्या मुली-मुलांना तसेच वंचीत समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे डॉ. गिरीश कुलकर्णी या मान्यवरांचा प्रवास सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उन्मेष बागवे व पत्रकार अलका धूपकर यांनी अनेक प्रश्नांच्या माध्यमातून उलगडला. तिन्ही मान्यवरांनी अनेक उदाहरणे देत आपल्या कार्याचा विस्तृत प्रवास श्रोत्यांसमोर उलगडला. त्यांच्या आयुष्यात आलेला संघर्ष आणि त्या संघर्षाचा जिद्दीने केलेला सामना हे सांगणारे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. काही प्रसंगांनी श्रोत्यांच्या अंगावर अक्षरश: काटे आले.सोशल मीडियाला आपण दोष का द्यायचा? त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहे. शेवटी ते माध्यम आहे. ते कसे हाताळावे, हे आपल्या हातात आहे, अशी भूमिका नाडकर्णी यांनी घेतली. तरुणांचे पुढचे नेतृत्व हे महानगरापेक्षा छोट्या गावांतून आलेले असेल. आज आयपीएलमधील उगवते तारेही महानगरातील नाहीत. त्यामुळेच महानगरांत-मोठ्या शहरांत राहणाऱ्या तरुणांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यांचा संघर्ष हा त्यांची जीवनशैली आणि चंगळवादाचा आहे. त्याला ही मुले कसे तोंड देणार? त्याबबात त्यांना वेळीच मार्गदर्शन केले नाही, तर पुढच्या काळात या मुलांचा आंतरिक संघर्ष उभा राहील. महापरिवर्तनाच्या विचारांची नव्याने मांडणी आणि कार्यकर्त्यांची साखळी उभी केली नाही; तर या मुलांचा संघर्ष वाढत जाईल. म्हणूनच तरुण पिढीवर शिक्के मारावे, असे मला वाटत नाही. त्यांना दोष देणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. उलट त्यांची मानसिक आणि भावनिक शक्ती वाढविण्याचे काम केले पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला. विचार हा मला संस्थेपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. विचारांचा वारसा पोहोचविण्याचे काम हे आव्हान आहे. तेते विचार पुढे जाण्याची स्ट्रॅटेजी त्यात्या संस्थेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे. संस्था आणि विचार हे वेगळे होऊ नयेत. वारसा हा संस्थेपुरता किंवा ज्ञानशाखेपुरता मर्यादित राहू नये, अशी मांडणी नाडकणी यांनी केली. विरंगुळा कशात शोधता असे विचारता विरंगुळ््याचे क्षण पैशानेच येतात, असे नाही; तर बिनपैशाचे विरंगुळेही खूप श्रीमंत असतात, असे त्यांनी सांगितले. उल्का महाजन म्हणाल्या की, माझी लढाई योग्य दिशेने सुरू आहे. माझी इतरांच्या जगण्यावरही श्रद्धा आहे. माझ्या ज्येष्ठांना मी कधी निराश पाहिले नाही. आपल्या कामाचा पल्ला व मर्यादा माहित असेल, तर निराश होता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला. आमचे काम संघटनात्मक म्हणजेच संवादाचे आहे. आता आमची मोठी फळी आहे. दुर्दैवाने लोकसंघटना आपल्या समाजात नाही. सेवेचे आकर्षण सर्वांनाच आहे. परंतु त्यात संघर्षाला स्थान नाही. संघर्ष करणाऱ्यांना विकासविरोधक ठरविले जाते. त्यामुळे संविधानातील किमान मूल्यांशी प्रामाणिक राहून आपापल्या क्षेत्रात काम करा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. निमशहरी भागातून येणाऱ्यांकडून खूप आशा आहे. हे तरुण नक्की समाजाला पुढे नेतील. जुन्या पिढीने आजच्या तरुण पिढीवर आरोप करु नयेत, असेही त्या म्हणाल्या. रचनेचे काम संघर्ष करुन टिकवावे लागते. रचनेकडून संघर्षाकडे आणि आता रचनेबरोबर संघर्ष असे आमचे काम सुरू आहे. नवीन पिढीला समजून घेण्यास मागची पिढी कमी पडतेय. ‘स्नेहालय’ चालविताना त्यामागची प्रेरणा महत्त्वाची वाटत असल्याचे महाजन म्हणाल्या.