शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महासभा-आयुक्त वाद आता थेट मुख्यमंत्री दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 02:25 IST

महापौरांची तक्रार : जयस्वाल यांच्यावर अनेक आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेतील लोकप्रतिधिी विरुद्ध आयुक्त वाद आता अधिकच पेटला आहे. शहराच्या ्रप्रथम नागरिक महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून त्यांना सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे निर्देश देऊन लोकप्रतिनिधींच्या घटनादत्त अधिकारांच्या होत असलेल्या पायमल्लीकडे लक्ष वेधले आहे.

देशात ज्याप्रमाणे संसद आणि राज्यात विधिमंडळ या सर्वोच्च सार्वभौम संस्था आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिकेची सर्वसाधारण सभा ही त्या शहराची सर्वोच्च सार्वभौम संस्था असून तिला ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हे जुमानत नसून लोकप्रतिनिधींच्या घटनादत्त अधिकारांची पायपल्ली करून त्यांना चोर ठरविण्याचा संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी केला आहे. ते स्वत:ही सर्वसाधारण सभेत उपस्थित राहत असून अधिकाऱ्यांनाही सभागृहाबाहेर घेऊन जात असल्याने शहरविकासाचे निर्णय घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्नलोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न विचारल्यास त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून त्यांची वैयक्तिकरित्या चौकशी लावून त्रास देत असल्याचे ही महापौरानी म्हटले आहे.अविश्वास ठरावाचे पत्र आमदारांनीच दिले लिहूनच्पालिका आयुक्तांनी अविश्वास ठराव आणण्यासंदर्भातील जे गोपनीय पत्र पाठवले आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच लिहून दिले असल्याचा खळबळजनक आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. एखाद्या आमदारांकडून अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची नामुष्की पालिका आयुक्तांवर येते यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी नसून आमदारांनीदेखील जाणतेची कामे करायची सोडून अशाप्रकारे आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांना पत्र लिहून देतात.च्ज्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधी अविश्वास ठराव आणण्यासाठी मागणी केली आणि नंतर आयुक्तांना पाठिंबा दिला, वास्तविक एक महिला महापौर असताना अशा प्रकारे पुरु षार्थ या मंडळीनी दाखवायला हवा होता तो दाखवला नाही. त्यामुळे ज्या बांगड्या माङया हातात आहेत त्या त्यांच्या हातात असायला पाहिजे होत्या असा टोला महापौरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना लगावला आहे. महापौरांच्या या आरोपांमुळे आता हा संघर्ष आता आणखी गडद झाला झाला आहे.विकासकामे रखडलीच्आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठाणे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत असून, अनेक कामे खोळंबली आहेत.च्यासाठी पावसाळयात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, झोपडपट्टीमधील शौचालयांच्या दुरु स्तीची कामे, महापालिका शाळांची दुरवस्था इत्यादी अनेक प्रश्न मार्गी लावणेस विलंब होत आहे.च्आयुक्तांची ही भूमिका २० लाख ठाणेकरांवर अन्याय करणारी असून त्यांच्या हितासाठी आयुक्तांना आपण सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत, असे महापौर शिंदे यांनी मुख्यमंंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.राष्ट्रीय ध्वजारोहणाला दांडीमहापौर म्हणून रु जू झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षाच्या काळात १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाचा एक कार्यक्र म वगळता प्रशासन प्रमुख आयुक्त हे ४ कार्यक्र मांना अनुपिस्थत होते, हा महापौरांचा अवमान नसून तो राष्ट्रध्वजाचा अवमान आहे, याकडे महापौरांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :thaneठाणे