शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून महासभा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ...

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ऑक्सिजन नसल्याने बेड रिकामे असून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या हातावर लावण्यासाठी शाई नाही, वॉरचा कारभार राम भरोसे असून पीपीई किट नसल्याने मृतदेह चक्क प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देण्याचा प्रकार घडला आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही वेळ ठाणेकरांवर आल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समिती स्थापण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

मंगळवारी महासभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी लक्षवेधी मांडून, प्रशासनाचे लक्ष वेधून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विक्रांत चव्हाण यांनी कोविडसाठी निधी देऊनही त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे पुढील तीन वर्षांचे योग्य नियोजन करून निधी उपलब्ध करून या आजारावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी मृतांची आकडेवारी वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पीपीई किट मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोहर डुंबरे यांनी खासगी रुग्णालयातील मृतदेह एक दिवस उलटूनही उचलले जात नसल्याचा आरोप केला. शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. दिव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथे अद्याप एकही कोविड सेंटर नसल्याची खंत बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. वॉर रूमची समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली.

गरीब रुग्णांना ग्लोबलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला महापालिकेकडून दिला जात असल्याचा आरोप यावेळी अनिता गौरी यांनी केला. डॉक्टर रुग्ण दाखल करून घेण्यासाठी घाबरत असून त्यांची मानसिकता बदलण्यात यावी, अशी मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाने त्यांचे नियोजन स्पष्ट करावे, नॉन-कोविड रुग्णालयांनादेखील रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी केली. ऑक्सिजन ठाण्यात येत आहे, मात्र सिलिंडर रिकामे येत असल्याची धक्कादायक माहिती अशोक वैती यांनी दिली. नजीब मुल्ला यांनी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, एफडीएचे काही अधिकारी, पोलीस यांचा समावेश करण्याची मागणी केल्यानंतर ती स्थापण्याचा ठराव यावेळी त्यांनी मांडला.

रुग्णसंख्या वाढल्याने ताण वाढला

दुसऱ्या लाटेतही महापालिकेने योग्य तयारी केलेली आहे. काही त्रुटी असतील; परंतु प्रशासनाचे काम सुरू आहे. या लाटेत बेड उपलब्ध न होणे, रुग्णांना औषधे न मिळाल्याने नगरसेवकांचा संताप वाढला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविरसह ऑक्सिजनवरून प्रशासनाला दोषी ठरविणे अयोग्य आहे. रोज रुग्ण वाढत असल्याने बेडदेखील उपलब्ध होत नाही, रुग्णांना रोज अधिकचा ऑक्सिजन लागत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो मिळावा यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, खासगी रुग्णालयांनाही महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा केला आहे. वॉर रूमच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न केला आहे. छोट्याछोट्या चुका का होतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

- नरेश म्हस्के - महापौर - ठामपा