शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून महासभा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ...

ठाणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोविड सेंटर उभारूनही त्या ठिकाणी मनुष्यबळ नसल्याने ती बंद आहेत. ऑक्सिजन नसल्याने बेड रिकामे असून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या हातावर लावण्यासाठी शाई नाही, वॉरचा कारभार राम भरोसे असून पीपीई किट नसल्याने मृतदेह चक्क प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देण्याचा प्रकार घडला आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही वेळ ठाणेकरांवर आल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समिती स्थापण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

मंगळवारी महासभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी लक्षवेधी मांडून, प्रशासनाचे लक्ष वेधून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विक्रांत चव्हाण यांनी कोविडसाठी निधी देऊनही त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे पुढील तीन वर्षांचे योग्य नियोजन करून निधी उपलब्ध करून या आजारावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी मृतांची आकडेवारी वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पीपीई किट मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोहर डुंबरे यांनी खासगी रुग्णालयातील मृतदेह एक दिवस उलटूनही उचलले जात नसल्याचा आरोप केला. शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. दिव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथे अद्याप एकही कोविड सेंटर नसल्याची खंत बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. वॉर रूमची समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली.

गरीब रुग्णांना ग्लोबलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला महापालिकेकडून दिला जात असल्याचा आरोप यावेळी अनिता गौरी यांनी केला. डॉक्टर रुग्ण दाखल करून घेण्यासाठी घाबरत असून त्यांची मानसिकता बदलण्यात यावी, अशी मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाने त्यांचे नियोजन स्पष्ट करावे, नॉन-कोविड रुग्णालयांनादेखील रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी केली. ऑक्सिजन ठाण्यात येत आहे, मात्र सिलिंडर रिकामे येत असल्याची धक्कादायक माहिती अशोक वैती यांनी दिली. नजीब मुल्ला यांनी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, एफडीएचे काही अधिकारी, पोलीस यांचा समावेश करण्याची मागणी केल्यानंतर ती स्थापण्याचा ठराव यावेळी त्यांनी मांडला.

रुग्णसंख्या वाढल्याने ताण वाढला

दुसऱ्या लाटेतही महापालिकेने योग्य तयारी केलेली आहे. काही त्रुटी असतील; परंतु प्रशासनाचे काम सुरू आहे. या लाटेत बेड उपलब्ध न होणे, रुग्णांना औषधे न मिळाल्याने नगरसेवकांचा संताप वाढला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविरसह ऑक्सिजनवरून प्रशासनाला दोषी ठरविणे अयोग्य आहे. रोज रुग्ण वाढत असल्याने बेडदेखील उपलब्ध होत नाही, रुग्णांना रोज अधिकचा ऑक्सिजन लागत असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो मिळावा यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, खासगी रुग्णालयांनाही महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा केला आहे. वॉर रूमच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न केला आहे. छोट्याछोट्या चुका का होतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

- नरेश म्हस्के - महापौर - ठामपा