शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 16:35 IST

गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

ठळक मुद्दे‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा गजलमध्ये सच्च माणूस घडविण्याची ताकद आहे - भीमराव पांचाळेदु:खाला सलाम करण्याची हिमत फक्त संतोष यांच्यात - मधुसुदन नानीवडेकर

ठाणे : गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी गजलमध्ये सच्च माणूस घडविण्याची ताकद आहे अशा भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केल्या. 

     ते म्हणाले की, आम्ही सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा वसा घेतला आहे. गजलकार संतोष यांच्यामधला गजलकार गजलनेच घडवला असल्याच ते म्हणाले. 9 व्या अ. भा. मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष मधुसुदन नानीवडेकर म्हणाले की, दु:खाला शरण सर्वच जण जातात पण त्याच दु:खाला सलाम करण्याची हिमत फक्त संतोष यांच्यात आहे. दु:खाला सलाम करायला कवीमन लागत असते असे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. महापालिका उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, वेदनेमुळे जगणं समृद्ध नव्हे तर समृद्धदार होते. दु:खाला सलाम करण्यासाठी समज असावी लागते. दु:खाला सलाम करीत नाही तोर्पयत दु:खाला भिडण्याचे बळ प्राप्त होत नाही. दु:खाला सलाम करण्याचे धारिष्टय़ संतोष यांच्या गजलांमधून वाचायला मिळेल असे ते म्हणाले. मी गजल, कवितांमधूनच घडलो अशा भावना खास लंडनहून आलेले अॅड. रविंद्र लगाडे यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संतोष व त्यांच्या आई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्य़ानंतर ज्येष्ठ गजलकार ए.के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित गजलकारांचा मुशायरा पेश झाला. ‘मोगरा फुलतो सकाळी, सोस थोडी कळ जरा’ या विशाल राजगुरूंनी सादर केलेल्या या गजलने मुशायराची सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र वैशंपायन यांनी ‘खोल जखमा माङया उरी, पण थेंब नेत्रीचा गळेना..’, पत्रकार माधव डोळे यांनी ‘ही मंद तेवते वात कधीची आत, ती प्रसन्न दु:खे पावन गाभा:यात’, ‘तूर पिकवली खूप, मिळेना भावच साला, फक्त आमचे शेतकरी नाच साला’, उपायुक्त माळवी यांनी ‘तु खुले आकाश माङो, तू नवा विश्वास माझा’, ‘मी शोध सुखाचा घ्याया, आयुष्य गमावून बसलो’, डी.एन. गांगला यांनी ‘कसे कसे मज धडे मिळाले, हि:याऐवजी खडे मिळाले’, संतोष शजर यांनी ‘माणूस होण्यापेक्षा मी जर पक्षी बनलो असतो, मंदिर, मस्जीद, गिरीजाघर कोठेही बसलो असतो’, नानीवडेकर यांनी ‘तुङयाकडे मागावे काही ही तर माझी हिंमत नाही, समजून काही द्यावे घ्यावे तेवढी तुझी दानत नाही’ तर शेख यांनी ‘सुखाबरोबर दु:खाचा सत्कार करुया, असे सहज आयुष्याचे अलवार करुया’ या गजल सादर झाल्या. यावेळी अधून मधून वाह वाह, क्या बात, बहुत बढीयाची दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन रवि मानकर यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई