शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 22, 2023 18:21 IST

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत.

ठाणे : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. अंगीभूत असलेल्या कला कौशल्य, जिद्द, मेहनत या गुणांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन हजार राख्या बनविल्या आहेत.

अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना आपला भाऊ मानणाऱ्या या गतिमंद विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी राख्या तयार केल्या आहेत. त्यांच्यासाठी या राख्या तयार करताना आनंद वाटत होता असे या मुलांनी सांगितले. रक्षाबंधन म्हणजेच राखी पोर्णिमा हा सण जवळ आला आहे. त्यानिमित्ताने रंगीबेरंगी राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या सर्व राख्यांमध्ये गतिमंद मुलांनी तयार केलेल्या राख्या या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या मुलांना सर्व सामान्यांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्वास गतिमंद केंद्र हे गेले अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांच्यातील कला कौशल्यांना वाट मिळावी यासाठी त्यांच्याकडून विविध वस्तू तयार करुन घेतल्या जातात. त्यातच राख्या बनविण्याचे काम गेले अनेक वर्षे सुरू असते. यंदा या २० मुला मुलींनी मिळून तब्बल तीन हजार राख्या बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील ५०० राख्या या जवानांना पाठविल्या आहेत. गेल्यावर्षी त्यांनी दोन हजार राख्या बनविल्या होत्या. या मुलांबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती होत आहे, त्यामुळे त्यांनी बनविलेल्या राख्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या वर्षी जादा राख्या बनविण्यात आल्याचे या केंद्राच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेRaksha Bandhanरक्षाबंधनIndian Armyभारतीय जवान