शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 22, 2023 18:21 IST

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत.

ठाणे : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. अंगीभूत असलेल्या कला कौशल्य, जिद्द, मेहनत या गुणांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन हजार राख्या बनविल्या आहेत.

अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना आपला भाऊ मानणाऱ्या या गतिमंद विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी राख्या तयार केल्या आहेत. त्यांच्यासाठी या राख्या तयार करताना आनंद वाटत होता असे या मुलांनी सांगितले. रक्षाबंधन म्हणजेच राखी पोर्णिमा हा सण जवळ आला आहे. त्यानिमित्ताने रंगीबेरंगी राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या सर्व राख्यांमध्ये गतिमंद मुलांनी तयार केलेल्या राख्या या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या मुलांना सर्व सामान्यांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्वास गतिमंद केंद्र हे गेले अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांच्यातील कला कौशल्यांना वाट मिळावी यासाठी त्यांच्याकडून विविध वस्तू तयार करुन घेतल्या जातात. त्यातच राख्या बनविण्याचे काम गेले अनेक वर्षे सुरू असते. यंदा या २० मुला मुलींनी मिळून तब्बल तीन हजार राख्या बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील ५०० राख्या या जवानांना पाठविल्या आहेत. गेल्यावर्षी त्यांनी दोन हजार राख्या बनविल्या होत्या. या मुलांबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती होत आहे, त्यामुळे त्यांनी बनविलेल्या राख्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या वर्षी जादा राख्या बनविण्यात आल्याचे या केंद्राच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेRaksha Bandhanरक्षाबंधनIndian Armyभारतीय जवान