शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भिवंडीत दुषीत पाण्याने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोचा आजार , बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:13 IST

भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक्यातील ग्रामिण भागात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या असून त्या ठिकाणी जिल्ह्यातील आदिवासी भागातून वीटभट्टी मजूर वीटा बनविण्यासाठी आलेला असतो. ...

ठळक मुद्दे आदिवासी भागातून येतो भिवंडीतील वीटभट्टी मजूरदोन वर्षाच्या मुलाला वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युसातजणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात दाखल

भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक्यातील ग्रामिण भागात मोठ्या संख्येने वीटभट्ट्या असून त्या ठिकाणी जिल्ह्यातील आदिवासी भागातून वीटभट्टी मजूर वीटा बनविण्यासाठी आलेला असतो. जिल्ह्यातील आदिवासी मजूर पावसाळ्यात शेतात तर पावसाळा संपल्यानंतर वीटा बनविण्यासाठी वीटभट्टीवर येत असतो. मात्र वीटभट्टी मालकाचे दुर्लक्ष असल्याने त्यांची रहाण्याची व पिण्याच्या पाण्याची आबाळ असते. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामिण भागात नेहमी पाण्याची कमतरता असते. तर वीटभट्ट्या गावापासून लांब असल्याने गावालगत अथवा वीटभट्टीजवळ असणारे डवरे,झरे,नदी,तलाव व विहिरी या स्त्रोतामधून मिळणाऱ्या पाण्यावर या मजूरांना अवलंबून रहावे लागते. अन्यथा वीटभट्टीसाठी आलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या स्त्रोतांमधून मिळणारे पाणी शुध्द अथवा अशुध्द असल्याचे मजूरांना महिती नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्या भागातील वीटभट्टी मजूरांची आरोग्य तपासणी होत नाही.शासन महिला व बालकांसाठी राबवित असलेले आरोग्यदायी उपक्रम मजूरांपर्यंत व त्यांचा मुलांपर्यंत न पोहोचल्याने मजूरांच्या कुटूंबाच्या जीवावर बेतते.असा प्रकार काल रोजी जूनांदुर्खी येथे घडला आहे. या भागातील वीटभट्टी मजूरांनी व त्यांच्या कुटूंबांनी दुषित पाणी प्यायल्याने त्यांना गेस्ट्रोची लागण झाली. मजूरांना व त्यांच्या मुलांना अचानक जुलाब, उलट्या सुरू झाल्या.गेस्ट्रोची लागण झालेल्या नयन निलेश मानकर या दोन वर्षाच्या मुलाचा काल गुरूवार रोजी मृत्यु झाल्यानंतर वीटभट्टी मालकाने या घटनेची माहिती चिंबीपाडा आरोग्य केंद्रात दिली.त्यानंतर आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले.आरोग्य पथकाने गुलाब गणपत वाजे (५५), दुदाराम चंदन पवार (४५), अमोल गुरु नाथ दिवे (१०), सुनिता मधुकर दिवे (५०), पारस गुरु नाथ दिवे (६), रोशनी अजय गावित (४), प्रगती दीपक गवळी (५) या सातजणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले .जूनांदूर्खी येथे गॅस्ट्रोमुळे झालेल्या दोन वर्षाच्या मुलाला वेळीच आरोग्य केंद्राकडून उपचार न मिळाल्याने त्याच्या मृत्युच्या चौकशीची मागणी परिसरांतील नागरिकांनी केली असून वीटभट्टीवर मोलमजूरीसाठी आलेल्या मजूरांसह गावातील लोकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा तसेच शुध्द पाण्यासाठी उपाययोजना पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात याव्यात.तसेच वीटभट्टी मजूरांची प्रत्येक आठवड्यात आरोग्य तपासणी करावी,अशी मागणी ग्रामिण समाजसेवी संस्था व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीwater pollutionजल प्रदूषण