शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० दिवसात एकदमच २५ रुपयाची भाव वाढ बुधवारी झाली. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरखर्च चालविण्यासाठी मिळणाऱ्या रकमेचे अख्खे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ‘आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या की काय!’ असे म्हणत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या १० दिवस आधी २५ रुपयाची वाढ झाली होता. तिची पुन्हा पुनरावृत्ती होऊन बुधवारी २५ रुपयानी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले. आठ ते दहा दिवसाच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका होत आहे. त्यातील भाववाढीने सर्वसामान्य होरपळत आहेत. आधीच आर्थिक आवक घटलेली आहे. कामासाठी मुंबईला जायचे म्हटले तरी लोकलचे तिकीट मिळत नाही. त्यात सतत होणाऱ्या या गॅस भाववाढीसह अन्यही अत्यावश्यक वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचेही हाल होत आहे. सत्ताधाऱ्यांवरील त्यांचा संताप मोठ्या उद्रेकास नियंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसाच्या आधी ८६० ते ८६५ रुपये गॅस सिलिंडरचा भाव होता. गेल्या आठ महिन्यात १५० ते १५५ रुपयाची गॅसची दरवाढ आधीच झालेली असताना, १० दिवसात त्यात पुन्हा २५ रुपयाची भर पडली.

केंद्र शासनाकडून या गॅस भाववाढीसह पेट्रोल, डिझेल भाव नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे लोकांकडून ऐकविले जात आहे. घरगुती गॅसचे भाव वाढविले आहेत. पण रोज नगदी पैशात खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या सिलिंडरमध्ये मात्र फारशी भाववाढ केलेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरगुती गॅसच्या किमती मात्र आताही वाढवून सामान्य, गरीब परिवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटात आधीच नोकऱ्या गेल्या आहेत. त्यास तोंड देताना विविध परिवार मेटाकुटीला आले आहेत. सद्यस्थितील तब्बल ८८५ रुपयास सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता गॅसऐवजी सरपणाचा पर्यायी वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर शहरात महिला फ्लॅटमध्येही चूल पेटविण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा तू तू... मै मै होऊन भांडणे वाढणार आहेत. ग्रामीण महिला आता गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागात सध्या रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात या गॅससह जीवनावश्यक वस्तू सत्व परीक्षा घेत असल्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

..........