शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० दिवसात एकदमच २५ रुपयाची भाव वाढ बुधवारी झाली. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरखर्च चालविण्यासाठी मिळणाऱ्या रकमेचे अख्खे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ‘आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या की काय!’ असे म्हणत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या १० दिवस आधी २५ रुपयाची वाढ झाली होता. तिची पुन्हा पुनरावृत्ती होऊन बुधवारी २५ रुपयानी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले. आठ ते दहा दिवसाच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका होत आहे. त्यातील भाववाढीने सर्वसामान्य होरपळत आहेत. आधीच आर्थिक आवक घटलेली आहे. कामासाठी मुंबईला जायचे म्हटले तरी लोकलचे तिकीट मिळत नाही. त्यात सतत होणाऱ्या या गॅस भाववाढीसह अन्यही अत्यावश्यक वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचेही हाल होत आहे. सत्ताधाऱ्यांवरील त्यांचा संताप मोठ्या उद्रेकास नियंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसाच्या आधी ८६० ते ८६५ रुपये गॅस सिलिंडरचा भाव होता. गेल्या आठ महिन्यात १५० ते १५५ रुपयाची गॅसची दरवाढ आधीच झालेली असताना, १० दिवसात त्यात पुन्हा २५ रुपयाची भर पडली.

केंद्र शासनाकडून या गॅस भाववाढीसह पेट्रोल, डिझेल भाव नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे लोकांकडून ऐकविले जात आहे. घरगुती गॅसचे भाव वाढविले आहेत. पण रोज नगदी पैशात खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या सिलिंडरमध्ये मात्र फारशी भाववाढ केलेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरगुती गॅसच्या किमती मात्र आताही वाढवून सामान्य, गरीब परिवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटात आधीच नोकऱ्या गेल्या आहेत. त्यास तोंड देताना विविध परिवार मेटाकुटीला आले आहेत. सद्यस्थितील तब्बल ८८५ रुपयास सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता गॅसऐवजी सरपणाचा पर्यायी वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर शहरात महिला फ्लॅटमध्येही चूल पेटविण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा तू तू... मै मै होऊन भांडणे वाढणार आहेत. ग्रामीण महिला आता गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागात सध्या रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात या गॅससह जीवनावश्यक वस्तू सत्व परीक्षा घेत असल्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

..........