शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० दिवसात एकदमच २५ रुपयाची भाव वाढ बुधवारी झाली. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरखर्च चालविण्यासाठी मिळणाऱ्या रकमेचे अख्खे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ‘आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या की काय!’ असे म्हणत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या १० दिवस आधी २५ रुपयाची वाढ झाली होता. तिची पुन्हा पुनरावृत्ती होऊन बुधवारी २५ रुपयानी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले. आठ ते दहा दिवसाच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका होत आहे. त्यातील भाववाढीने सर्वसामान्य होरपळत आहेत. आधीच आर्थिक आवक घटलेली आहे. कामासाठी मुंबईला जायचे म्हटले तरी लोकलचे तिकीट मिळत नाही. त्यात सतत होणाऱ्या या गॅस भाववाढीसह अन्यही अत्यावश्यक वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचेही हाल होत आहे. सत्ताधाऱ्यांवरील त्यांचा संताप मोठ्या उद्रेकास नियंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसाच्या आधी ८६० ते ८६५ रुपये गॅस सिलिंडरचा भाव होता. गेल्या आठ महिन्यात १५० ते १५५ रुपयाची गॅसची दरवाढ आधीच झालेली असताना, १० दिवसात त्यात पुन्हा २५ रुपयाची भर पडली.

केंद्र शासनाकडून या गॅस भाववाढीसह पेट्रोल, डिझेल भाव नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे लोकांकडून ऐकविले जात आहे. घरगुती गॅसचे भाव वाढविले आहेत. पण रोज नगदी पैशात खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या सिलिंडरमध्ये मात्र फारशी भाववाढ केलेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरगुती गॅसच्या किमती मात्र आताही वाढवून सामान्य, गरीब परिवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटात आधीच नोकऱ्या गेल्या आहेत. त्यास तोंड देताना विविध परिवार मेटाकुटीला आले आहेत. सद्यस्थितील तब्बल ८८५ रुपयास सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता गॅसऐवजी सरपणाचा पर्यायी वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर शहरात महिला फ्लॅटमध्येही चूल पेटविण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा तू तू... मै मै होऊन भांडणे वाढणार आहेत. ग्रामीण महिला आता गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागात सध्या रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात या गॅससह जीवनावश्यक वस्तू सत्व परीक्षा घेत असल्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

..........