शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० दिवसात एकदमच २५ रुपयाची भाव वाढ बुधवारी झाली. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरखर्च चालविण्यासाठी मिळणाऱ्या रकमेचे अख्खे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ‘आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या की काय!’ असे म्हणत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या १० दिवस आधी २५ रुपयाची वाढ झाली होता. तिची पुन्हा पुनरावृत्ती होऊन बुधवारी २५ रुपयानी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले. आठ ते दहा दिवसाच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका होत आहे. त्यातील भाववाढीने सर्वसामान्य होरपळत आहेत. आधीच आर्थिक आवक घटलेली आहे. कामासाठी मुंबईला जायचे म्हटले तरी लोकलचे तिकीट मिळत नाही. त्यात सतत होणाऱ्या या गॅस भाववाढीसह अन्यही अत्यावश्यक वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचेही हाल होत आहे. सत्ताधाऱ्यांवरील त्यांचा संताप मोठ्या उद्रेकास नियंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसाच्या आधी ८६० ते ८६५ रुपये गॅस सिलिंडरचा भाव होता. गेल्या आठ महिन्यात १५० ते १५५ रुपयाची गॅसची दरवाढ आधीच झालेली असताना, १० दिवसात त्यात पुन्हा २५ रुपयाची भर पडली.

केंद्र शासनाकडून या गॅस भाववाढीसह पेट्रोल, डिझेल भाव नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे लोकांकडून ऐकविले जात आहे. घरगुती गॅसचे भाव वाढविले आहेत. पण रोज नगदी पैशात खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या सिलिंडरमध्ये मात्र फारशी भाववाढ केलेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरगुती गॅसच्या किमती मात्र आताही वाढवून सामान्य, गरीब परिवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटात आधीच नोकऱ्या गेल्या आहेत. त्यास तोंड देताना विविध परिवार मेटाकुटीला आले आहेत. सद्यस्थितील तब्बल ८८५ रुपयास सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता गॅसऐवजी सरपणाचा पर्यायी वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर शहरात महिला फ्लॅटमध्येही चूल पेटविण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा तू तू... मै मै होऊन भांडणे वाढणार आहेत. ग्रामीण महिला आता गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागात सध्या रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात या गॅससह जीवनावश्यक वस्तू सत्व परीक्षा घेत असल्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

..........