शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाच महिन्यांपासून मिळतोय रेशनवर कचरायुक्त गहू

By admin | Updated: November 30, 2015 02:12 IST

स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला

नामदेव पाषाणकर, घोडबंदरस्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला जात असल्याने महिलावर्गात संताप आहे. गव्हात खडे, माती व कचऱ्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांहून अधिक असल्याने तो निवडता निवडता महिलांचे कंबरडे मोडत आहे. दोन रु पयांत काय मिळते, म्हणून नाइलाजाने तो खाण्यावाचून पर्याय नसल्याने वापरला जात आहे.अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू, तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार धान्याचा दर्जा तपासण्यात येतो. तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्याची उचल करण्यात येते. संयुक्त तपासणीच्या वेळी भारतीय महामंडळाचे व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तरीही, कचरा मिसळलेला गहू रेशन दुकानांपर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे उत्तर अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळत नाही. हे अधिकारी धान्याचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करत असतात. ज्यांनी तो सादर केला नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. असे सांगितले जात असले तरी अशी कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने ही भ्रष्टाचाराची साखळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कचरा असलेला हा गहू खरेदी करताना रेशनकार्डधारक आणि दुकानदारांत खटके उडत आहेत.कचरा असलेला गहू कार्डधारकांना पुरवला जात नसून कुठल्या दुकानांत असा गहू आहे, त्या दुकानांची नावे द्या. आम्ही तपासणी करून कारवाई करू, असे उपनियंत्रक अशोक मुंडे यांनी सांगितले.