शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

पाच महिन्यांपासून मिळतोय रेशनवर कचरायुक्त गहू

By admin | Updated: November 30, 2015 02:12 IST

स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला

नामदेव पाषाणकर, घोडबंदरस्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला जात असल्याने महिलावर्गात संताप आहे. गव्हात खडे, माती व कचऱ्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांहून अधिक असल्याने तो निवडता निवडता महिलांचे कंबरडे मोडत आहे. दोन रु पयांत काय मिळते, म्हणून नाइलाजाने तो खाण्यावाचून पर्याय नसल्याने वापरला जात आहे.अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू, तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार धान्याचा दर्जा तपासण्यात येतो. तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्याची उचल करण्यात येते. संयुक्त तपासणीच्या वेळी भारतीय महामंडळाचे व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तरीही, कचरा मिसळलेला गहू रेशन दुकानांपर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे उत्तर अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळत नाही. हे अधिकारी धान्याचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करत असतात. ज्यांनी तो सादर केला नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. असे सांगितले जात असले तरी अशी कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने ही भ्रष्टाचाराची साखळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कचरा असलेला हा गहू खरेदी करताना रेशनकार्डधारक आणि दुकानदारांत खटके उडत आहेत.कचरा असलेला गहू कार्डधारकांना पुरवला जात नसून कुठल्या दुकानांत असा गहू आहे, त्या दुकानांची नावे द्या. आम्ही तपासणी करून कारवाई करू, असे उपनियंत्रक अशोक मुंडे यांनी सांगितले.