शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

सेंद्रिय खत प्रकल्पामुळे कचरा समस्या सुटली

By admin | Updated: November 12, 2016 06:28 IST

महापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपातळीवर प्रकल्पाची दखल घेतली जात आहे. मात्र, महापालिकेने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात अनियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात अनेकदा कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईची भीती होती. ही परिस्थिती विचारात घेऊन सोंडे यांनी वर्षभरापूर्वी सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला. कॅम्प नं.-५, दूधनाका येथील जागेत स्वर्चाने सिमेंटच्या आठ मोठ्या टाक्या बनवून शेजारी पाण्याची व्यवस्था केली. कॅम्प नं-४ व ५ येथील भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला जमा करून सिमेंटच्या टाक्यात टाकून सेंद्रिय खत बनवले. तसेच सेंद्रिय खतावर बाग फुलवली आहे. पालिकेने लावलेल्या रस्त्यालगतच्या झाडांना सेंद्रिय खत देण्याचे कामही त्या करीत आहेत. या प्रकल्पाची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. मात्र, पालिकेने त्याची साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून नगरसेवक केरळ आदी ठिकाणी जातात. मात्र, एका नगरसेविकेने उभ्या केलेल्या सेंद्रिय प्रकल्पाला भेट देण्याची तसदी घेत नाहीत. घराघरांतील टाकाऊ भाजीपाला कचऱ्यात टाकण्याऐवजी प्रत्येक १५ घरांमागे एक प्लास्टिकचा ड्रम त्यांनी प्रभागात ठेवला आहे. नागरिकांना टाकाऊ भाजीपाला त्यात टाकण्यास सांगितले आहे. त्यात झाडे लावली आहेत.