शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

सेंद्रिय खत प्रकल्पामुळे कचरा समस्या सुटली

By admin | Updated: November 12, 2016 06:28 IST

महापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपातळीवर प्रकल्पाची दखल घेतली जात आहे. मात्र, महापालिकेने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात अनियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात अनेकदा कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईची भीती होती. ही परिस्थिती विचारात घेऊन सोंडे यांनी वर्षभरापूर्वी सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला. कॅम्प नं.-५, दूधनाका येथील जागेत स्वर्चाने सिमेंटच्या आठ मोठ्या टाक्या बनवून शेजारी पाण्याची व्यवस्था केली. कॅम्प नं-४ व ५ येथील भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला जमा करून सिमेंटच्या टाक्यात टाकून सेंद्रिय खत बनवले. तसेच सेंद्रिय खतावर बाग फुलवली आहे. पालिकेने लावलेल्या रस्त्यालगतच्या झाडांना सेंद्रिय खत देण्याचे कामही त्या करीत आहेत. या प्रकल्पाची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. मात्र, पालिकेने त्याची साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून नगरसेवक केरळ आदी ठिकाणी जातात. मात्र, एका नगरसेविकेने उभ्या केलेल्या सेंद्रिय प्रकल्पाला भेट देण्याची तसदी घेत नाहीत. घराघरांतील टाकाऊ भाजीपाला कचऱ्यात टाकण्याऐवजी प्रत्येक १५ घरांमागे एक प्लास्टिकचा ड्रम त्यांनी प्रभागात ठेवला आहे. नागरिकांना टाकाऊ भाजीपाला त्यात टाकण्यास सांगितले आहे. त्यात झाडे लावली आहेत.