शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कल्याण-डोंबिवलीतील कचरा ४० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:51 IST

३४० टन होतोय गोळा; लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम, मात्र डम्पिंगवर ढीग कायम

- मुरलीधर भवार कल्याण : सध्याच्या लॉकडाउनमुळे शहरांतील केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला मार्केट, किराणा, बेकरी आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. अन्य दुकाने, बाजारपेठा, कारखाने, उद्योग व इतर अस्थापने बंद असल्याने कल्याण-डोंबिवली शहरांतील कचऱ्याचे प्रमाणही ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.पूर्वीच्या तुलनेत सध्या दररोज ३५० टन कचरा गोळा केला जात आहे. केडीएमसी हद्दीतून दररोज ६५० टन कचरा गोळा केला जातो. परंतु, त्यात ४० टक्क्यांनी घट झाल्याने ३५० टन कचरा डम्पिंगवर जात आहे. महापालिकेसाठी ही बाब समाधानकारक असली तरी आधारवाडी डम्पिंगवरील कचºयाचा डोंगर कमी झालेला नाही. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे डम्पिंग १५ मे पर्यंत बंद केले जाईल, असे सांगितले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची सगळी शक्ती कोरोनाशी मुकाबला करण्यावर खर्ची होत आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य साध्य करता येणे शक्य नाही. मात्र, लॉकडाउनच्या काळात कचरा कमी झाला आहे.सध्या घरी असलेल्या नागरिकांनी ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्यास चित्र बदलू शकते, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी सांगितले.आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सौराष्ट्र कंपनीने प्रक्रिया प्रकल्प उभारला होता. मात्र, प्रक्रिया करण्यात येणाºया कचºयाचे प्रमाण १०० ते १५० टन होते. तर येथे येऊन पडणारा कचरा ६५० टन आहे. त्यामुळे कचºयाचा डोंगर कमी होऊ शकला नाही. महापालिकेने उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. उंबर्डे प्रकल्प बांधून तयार असून, तेथे कचºयावर प्रक्रियेचे काम सुरू होणार होते.परंतु, सध्याच्या लॉकडाउनमुळेप्रकल्पातील कामगार गावी गेल्याने प्रकल्पाचे काम ठप्प झाले. सोमवार, २७ एप्रिलपासून या प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे, अशी माहिती केडीएमसीचे अभियंते मिलिंद गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या दोन हजार ४०४ किलो कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियाकोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीतील कचरा स्वतंत्र वाहनातून काळजीपूर्वक गोळा करून त्याची जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील २० प्रभागांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.कोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीमधून आतापर्यंत दोन हजार ४०४ किलो कचरा गोळा करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्याचा अहवाल अभियंता गोपाळ भांगरे यांनी केंद्रीय आरोग्य विभागास आॅनलाइनद्वारे पाठविला आहे. केंद्राकडून याबाबत महापालिकेस विचारणा करण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdumpingकचरा