शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन

By पंकज पाटील | Updated: April 2, 2023 15:18 IST

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी चक्क बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप केले.

अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल परिसरात पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नेहमीच केमिकलयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच इथे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीत भर पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूला विद्रूप अवस्था पाहायला मिळत आहे. गोविंद पुलाचा हा रस्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणारे पर्यटक याच रस्त्याने शिवमंदिराकडे जातात. त्यामुळे अशी घाण पाहून शहराची प्रतिमा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात चुकीची तयार होत असल्याचा आरोप भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने केला आहे.

याबाबत पालिकेला अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी गोविंद पुलावर बसून हाती बोर्नव्हिटा आणि बदाम घेत आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांना आम्ही बदाम आणि बोर्नव्हिटा देत असल्याचे यावेळी आंदोलन करणारे प्रकाश नलावडे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ambernathअंबरनाथ