शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन

By पंकज पाटील | Updated: April 2, 2023 15:18 IST

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी चक्क बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप केले.

अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल परिसरात पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नेहमीच केमिकलयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच इथे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीत भर पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूला विद्रूप अवस्था पाहायला मिळत आहे. गोविंद पुलाचा हा रस्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणारे पर्यटक याच रस्त्याने शिवमंदिराकडे जातात. त्यामुळे अशी घाण पाहून शहराची प्रतिमा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात चुकीची तयार होत असल्याचा आरोप भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने केला आहे.

याबाबत पालिकेला अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी गोविंद पुलावर बसून हाती बोर्नव्हिटा आणि बदाम घेत आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांना आम्ही बदाम आणि बोर्नव्हिटा देत असल्याचे यावेळी आंदोलन करणारे प्रकाश नलावडे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ambernathअंबरनाथ