शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कचराकोंडी फुटण्याची चिन्हे

By admin | Updated: November 16, 2016 04:27 IST

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची प्रक्रिया हा विषय वारंवार चर्चेत होता. यावेळी मात्र महापालिकेने मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून चारही प्रकल्पांना निविदादारांचा प्रतिसाद मिळाला आहे. या निविदांचे प्रशासनाकडून परीक्षण सुरु असून त्यानंतरच निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर केल्या जाणार आहेत. ते पाहता कल्याण-डोंबिवलीतील कचराकोंडी फुटण्याची आशा निर्माण झाली आहे.महापालिकेने आधारवाडी डम्पिंंग ग्राऊं ड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळी निविदा मागविली होती. तिलाही गेल्या आठवड्यात प्रतिसाद मिळाला. गुजरातमधील सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने त्याची ३० कोटींची निविदा भरली आहे. यापूर्वी नवी मुंबईतील गिरीश इंटरप्रायझेस कंपनीने निविदा सादर केली होती. ही निविदा एकमेव होती आणि जादा दराची असल्याने ती नाकारण्यात आली होती. डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेला भरावभूमी क्षेत्रही विकसित करायचे आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या निविदेला मिळालेल्या प्रतिसादापाठोपाठ बारावे भरावभूमीसाठी १० कोटी ९० लाखांची आणि मांडा भरावभूमीसाठी ११ कोटी ९० लाखांची निविदा सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने भरली आहे. उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पासाठी दोन निविदा मिळाल्या आहेत. त्यापैकी सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने १६ कोटी ४१ लाखांची निविदा भरली आहे. ठाण्यातील बायोक्लिन या कंपनीने याच प्रकल्पासाठी २४ कोटींची निविदा सादर केली आहे. ही निविदा इन्व्हायरो कंपनीने भरलेल्या किंमतीपेक्षा आठ कोटींहून अधिक रकमेची आहे. त्यामुळे उंबर्डे प्रकल्पाच्या निविदेत स्पर्धा होणार आहे. अर्थात कमी किंमतीची निविदा स्वीकारली जाण्याची दाट शक्यता आहे. या सर्व निविदा प्रशासनाने लेखा परीक्षणासाठी पाठविल्या आहेत. त्यानंतर त्या मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. उंबर्डे येथील १० हेक्टर जागेवर ३०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणे अपेक्षित आहे. त्यात कचऱ्याचे वर्गीकरण, त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर बारावे येथील २.२३ हेक्टर जागेवरील भरावभूमी विकसित करण्यात येईल. त्याठिकाणी २०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. तसेच मांडा येथील ९ हेक्टर जागेवर १५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भरावभूमी विकसीत होणार आहे. (प्रतिनिधी)