शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भटक्या गायी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय

By admin | Updated: July 30, 2015 23:03 IST

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गायी चोरुन त्यांच्या मांसाची विक्री करण्यात येत आहे. या गाय चोरांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गायींचे प्रमाण मोठे आहे. दिवसभर चरल्यानंतर रात्री ह्या गायी विसाव्यासाठी मोकळ्या मैदानांवर बसतात. या गायींच्या कळपातील किमान एका गायीला चोरुन नेण्याचा सपाटा काही समाजकटंकांनी सुरु केला आहे. चोरलेल्या गायीची विक्री थेट मास विक्रेत्यांकडे करण्यात येत आहे. तर काही मास विक्रेत्यांनीच स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा गाय चोरण्यासाठी उभारली आहे. अंबरनाथमधील चिंचपाडा, कोहजगांव, शास्त्रीनगर, बुवापाडा, मोरीवली, नालंबी गांव परिसर, शिवाजीनगर, लोकनगरी, हरीओम पार्क परिसर, चिखलोली गांव या परिसरातील भटक्या गायी चोरण्यासाठी ही टोळी रात्रीच्यावेळी सक्रिय असते. असाच प्रकार बदलापूरातही घडत आहे.रात्री १२ नंतर या टोळीतील दोघे दुचाकीवरुन गायींच्या कळपांची पाहणी करतात. एकांत मिळताच त्यातील मागे बसलेला चोर या गायींपैकी एखाद दुसऱ्या गायीला बेशुध्द करणारे औषध असलेले पाव देऊन बेशुध्द करतात. चार चाकी गाडीतून काही चोरटे गायीजवळ आल्यावर काही क्षणात या गायींचे पाय बांधून त्यांना अवघ्या मिनिटभरातच गाडीत कोंबतात. त्यासाठी हे दुचाकीस्वारही त्यांना मदत करतात. खास गाय चोरण्यासाठी ही गाडी तयार करण्यात आलेली असते. चोरलेल्या गायी याच परिसरातील मास विक्रेत्यांकडे पाठविण्यात येतात. गाय चोरण्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर कोहजगांवातील ग्रामस्थांनी गाय चोरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. चिंचपाडा आणि कोहजगांव परिसरातील भटक्या गायींना एकत्रित करुन त्यांचे संरक्षण करण्याचे काम गावातील तरुणांना देण्यात आले आहे. हे तरुण देखील रात्रभर जागून या गायींचे संरक्षण करित आहेत. आता पोलीस देखील याच तरुणांची मदत घेत आहेत. पोलीसांना रात्रीच्यावेळी एखादी गाय बेशुध्द अवस्थेत दिसल्यास त्याची माहिती स्वत: पोलीस या तरुणांना देतात. ही माहिती मिळाल्यावर गायींना शुध्दीवर आणून त्यांना संरक्षित ठिकाणी हे तरुण नेतात. कोहजगांवातील तरुणांनी सुरु केलेले काम आता अंबरनाथच्या इतर परिसरातही सुरु केल्यास गाय चोणा-यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)