शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून १४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 16:18 IST

विविध राज्यांतील भाषा आणि तेथील खाद्यसंक्ृतीबद्दल गंधार कुळकर्णीने रोमांचक माहिती कट्टेकऱ्यांना दिली.

ठळक मुद्दे१४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवासमातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सायकलवरून प्रवास३३ राज्य गंधारने सायकलवरुन काढले पिंजून

ठाणे : मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून चौदा महिने सायकलवरून १९८५० किमी पिंजून काढणाºया गंधार कुळकर्णी या तरुणाने आपला प्रवास दृकश्राव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. सायकल आणि मी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना गंधारने जपानमध्ये जशी जपान भाषा वेगळी केली तशा आपण आपल्या भाषा वेगळ््या केल्या का असा सवाल उपस्थित केला. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गंधारने आपला सायकलवरचा रोमहर्षक थरारक प्रवास अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांसमोर उलगडला.

               ३३ राज्य गंधारने सायकलवरुन पिंजून काढले. विविध राज्यांतील भाषांचे वैशिष्ट्य सांगताना गंधारने तेथील खाद्यसंस्कृतीही उलगडली. भारतातील भाषा पाश्चात्यांनी चार कुळांत विभागल्या. भारतीयांनी आपापल्या भाषेतील साम्य पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? हे विविध राज्यांत फिरल्यावर दिसते. लिपी आणि भाषा या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. पण कोणतीही भाषा कोणत्याही एका लिपीत लिहू शकत नाही. हिंदी लिपी नसून ती भाषा आहे. देवनगरी ही लिपी आहे. आपल्याच भाषांच्या परस्परांमधील साम्य आपण जाणून घेतले पाहिजे असेही गंधारने सांगितले. चोरावर मोर आपण म्हणतो पण मल्याळममध्ये चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक त्यामुळे भातावर ताक असा अर्थ होतो. प्रत्येक राज्यात संस्कृतमधील शिक्षण वेगवेगळ््या प्रकारे पाहायला मिळते. संस्कृतमध्ये काय शिकायचे असा प्रश्न विद्यार्थ्याला जेव्हा पडतो तेव्हा त्या अभ्यासाचा भविष्यात काहीही फायदा होत नाही. छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर देवरी गाव असून तेथील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी शाळेतील अभ्यासिकेचे दोन तास आधीच निघावे लागते. याचे कारण तेथील शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी या बस नंतर खूप वेळाने विद्यार्थ्यांनी एसटी मिळते. एसटीसाठी विद्यार्थ्यांना तासन तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचा अनुभव कथन केला. कोकणी भाषा, गोवा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य यांचे चांगले संबंध दिसून येतात. परंतू राजकीय शक्तीमुळे कोकणी आणि मराठी भाषेत दरी निर्माण केली जाते. आपण कोकणी भाषा म्हणून स्वीकारली, गोवा राज्य म्हणून स्वीकरले. असे असताना कोकणी मराठी भाषेतून निर्माण झाली असे आपण म्हणतो तेव्हा गोव्यातील लोक दु:खी होतात. त्यामुळे कोकणी ही आपली बहिण म्हणून स्वीकारावे असे मत मांडताना गंधार पुढे म्हणाला की, भाषांना समांतर स्थान दिले तर परस्परांमधला भेद दूर होईल. कोकणी भाषेला वेगळे अस्तित्व आहे हे मानून पुढे गेलो तर एकात्मता दिसेल. शेवटी प्रश्नोत्तराचा तास रंगला.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक