शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून १४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 16:18 IST

विविध राज्यांतील भाषा आणि तेथील खाद्यसंक्ृतीबद्दल गंधार कुळकर्णीने रोमांचक माहिती कट्टेकऱ्यांना दिली.

ठळक मुद्दे१४ महिने सायकलवरून प्रवास करणाऱ्या गंधारने उलगडला प्रवासमातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सायकलवरून प्रवास३३ राज्य गंधारने सायकलवरुन काढले पिंजून

ठाणे : मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून चौदा महिने सायकलवरून १९८५० किमी पिंजून काढणाºया गंधार कुळकर्णी या तरुणाने आपला प्रवास दृकश्राव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. सायकल आणि मी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना गंधारने जपानमध्ये जशी जपान भाषा वेगळी केली तशा आपण आपल्या भाषा वेगळ््या केल्या का असा सवाल उपस्थित केला. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गंधारने आपला सायकलवरचा रोमहर्षक थरारक प्रवास अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांसमोर उलगडला.

               ३३ राज्य गंधारने सायकलवरुन पिंजून काढले. विविध राज्यांतील भाषांचे वैशिष्ट्य सांगताना गंधारने तेथील खाद्यसंस्कृतीही उलगडली. भारतातील भाषा पाश्चात्यांनी चार कुळांत विभागल्या. भारतीयांनी आपापल्या भाषेतील साम्य पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? हे विविध राज्यांत फिरल्यावर दिसते. लिपी आणि भाषा या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. पण कोणतीही भाषा कोणत्याही एका लिपीत लिहू शकत नाही. हिंदी लिपी नसून ती भाषा आहे. देवनगरी ही लिपी आहे. आपल्याच भाषांच्या परस्परांमधील साम्य आपण जाणून घेतले पाहिजे असेही गंधारने सांगितले. चोरावर मोर आपण म्हणतो पण मल्याळममध्ये चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक त्यामुळे भातावर ताक असा अर्थ होतो. प्रत्येक राज्यात संस्कृतमधील शिक्षण वेगवेगळ््या प्रकारे पाहायला मिळते. संस्कृतमध्ये काय शिकायचे असा प्रश्न विद्यार्थ्याला जेव्हा पडतो तेव्हा त्या अभ्यासाचा भविष्यात काहीही फायदा होत नाही. छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर देवरी गाव असून तेथील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी शाळेतील अभ्यासिकेचे दोन तास आधीच निघावे लागते. याचे कारण तेथील शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी या बस नंतर खूप वेळाने विद्यार्थ्यांनी एसटी मिळते. एसटीसाठी विद्यार्थ्यांना तासन तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचा अनुभव कथन केला. कोकणी भाषा, गोवा प्रांत आणि महाराष्ट्र राज्य यांचे चांगले संबंध दिसून येतात. परंतू राजकीय शक्तीमुळे कोकणी आणि मराठी भाषेत दरी निर्माण केली जाते. आपण कोकणी भाषा म्हणून स्वीकारली, गोवा राज्य म्हणून स्वीकरले. असे असताना कोकणी मराठी भाषेतून निर्माण झाली असे आपण म्हणतो तेव्हा गोव्यातील लोक दु:खी होतात. त्यामुळे कोकणी ही आपली बहिण म्हणून स्वीकारावे असे मत मांडताना गंधार पुढे म्हणाला की, भाषांना समांतर स्थान दिले तर परस्परांमधला भेद दूर होईल. कोकणी भाषेला वेगळे अस्तित्व आहे हे मानून पुढे गेलो तर एकात्मता दिसेल. शेवटी प्रश्नोत्तराचा तास रंगला.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक