शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी टाकण्याच्या कामामध्ये हलगर्जी; सर्व्हिस रोडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:10 IST

वेल्फेअर असोसिएशनचे एमआयडीसीला पत्र

डोंबिवली : निवासी भागात एमआयडीसीकडून सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या कामामध्ये हलगर्जी सुरू असल्याचा आरोप येथील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

एमआयडीसीकडून नवीन जलवाहिन्या आणि पावसाळी गटार आणि छोटे नाले बांधण्याचे काम सध्या निवासी भागात सुरू आहेत. छोट्या जलवाहिन्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या सर्व्हिस रोडवर जमिनीखालून टाकण्याचे काम सुरू आहे. जाणकारांच्या मते या वाहिन्या टाकताना त्यावर प्लास्टिक कोटिंग करणे गरजेचे आहे. तसेच वाहिन्या जमिनीखाली टाकताना त्याच्या खाली व बाजूला काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोटिंगचे काम सुरू झाले आहे.

जलवाहिन्यांच्या खालच्या काँक्रीटीकरणाकडे मात्र कानाडोळा झाला असल्याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने लक्ष वेधले आहे.सध्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे खणून त्यात जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. या कामामुळे हा रोड खोदण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर निवासी भागातील जे मोजके रस्ते एमआयडीसीकडून सुस्थितीत आणले होते. त्यापैकी एक असलेल्या सर्व्हिस रोडची या खोदकामांमुळे पुन्हा दुर्दशा झाली आहे. एमआयडीसीत जमिनी खालून महानगर गॅसच्या वाहिन्या टाकल्या आहेत. त्याच्याच बाजूला महावितरणच्या केबल आणि खासगी मोबाइल कंपन्यांच्याही केबल आहेत. जलवाहिन्या आणि गटार, नाले बांधकामासाठी खोदकाम करताना सरकारी आणि खासगी कंपन्यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबतीत गांभीर्याने विचार करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.पाण्याची क्षमता न तपासता बांधणीगटार आणि छोेटे नालेबांधणीचे काम सुरू आहे; पण पावसात पडणाऱ्या पाण्याची वहन क्षमता न तपासता काही ठिकाणी लहान तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे गटार आणि नाले बांधण्याचे काम चालू आहे. नाल्याच्या रुंदीत तसेच काँक्रीटच्या भिंतीतही कमी-अधिक जाडीचा फरक असल्याचे वेल्फेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. दरवर्षी निवासी भागात पावसाळ्यात येणाºया पुराचा विचार ही कामे करताना केला गेला नसल्याचा आरोप असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केला आहे.