शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गडकरी रंगायतनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला राष्ट्रीय मतदार दिनी; कलाकारांनी घेतली मतदानाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:28 IST

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागातर्फेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वाँर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा

ठळक मुद्दे ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावेजर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाहीजिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

ठाणे : येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. यावेळी ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली, एवढेच नव्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मराठी चित्रपट, मालिका कलाकारांनी देखील आपल्यावरील मतदानाविषयी निरूत्साही असण्याचा शिक्का पुसून काढत मतदान यादीत नाव नोंदविल्याचा तसेच मतदान करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागातर्फेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वाँर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा. मी नाव नोंदवून देखील ते मतदार यादीत आले नव्हेत किंवा कसे गायब झाले कळले नव्हते, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा करून आपले नाव पुढील वेळेस कसे मतदान यादीत येईल हे पाहिले.श्वास, डोंबिवली फास्ट सारख्या चित्रपटातून आपल्या समर्थ अभिनयाची प्रचिती दिलेले संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुम्ही जर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाही, त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही बजावलेच पाहिजे. ज्या व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावत नाही, त्याना प्रस्थापित सरकारच्या विरोधात बोलण्याचा अजिबात हक्क नाही किंबहुना मतदान न केल्यामुळे तुम्ही तो गमावता असे ते म्हणाले. यावेळी कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यिक्षक दाखिवण्यात आले.युवा मतदारांनी मतदान प्रक्रि येत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी निबंध, वक्तृत्व , रांगोळी अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागती केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नवोदित मतदार, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आले. मतदार नोंदणीत उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, उपजिल्हाधिकारी जलिसंग वळवी, उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, अधिक पाटील, विकास पाटील, राज तवटे उपस्थित होते.* ‘तुम्ही आता बच्चा नाही आहात’ - शनाया- मराठी मालिकेतील ‘गुरु ’ उर्फ अभिजित खांडकेकर याने सांगितले की हा उत्साह बघून महाविद्यालयीन दिवस आठवतात. मी देखील आवर्जून मतदार करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान केलेच पाहिजे, बानो आणि शनायाच्या भूमिका केलेल्या इशा केसकर हिने देखील तुम्ही आता बच्चा नसून सुजाण नागरिक आहात. ज्यावेळी तुम्ही मतदानाचा अधिकार राबवाल त्याचवेळी एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवण्याचा हक्क आहे, अन्यथा नाही. आपण मतदान करणार असून कितीही व्यस्त असलो तरी हे कर्तव्य बजावणारच आहे असेही तिने सांगितले.*सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्ये- यंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘ नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहार्इंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे ,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात तीन लाख ९२ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. सर्वाधिक ४० हजार २२९ कल्याण ग्रामीण मध्ये, तर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७ नावे नोंदविण्यात आली. ऐरोली २० हजार १६२, मुंब्रा कळवा १८ हजार ५९७, मीरा भार्इंदर २२ हजार ७१४ , भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार१३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ अशी १८ विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीची आकडेवारी आहे.