शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या खाद्यपदार्थांत गब्बरसिंग टॅक्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:00 IST

कोकण रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गाड्यांना विलंब होत असतानाच त्यातील खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : कोकण रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गाड्यांना विलंब होत असतानाच त्यातील खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी जीएसटीचे कारण पुढे केले जात असल्याने प्रवासी आणि कंत्राटदाराच्या कर्मचाºयांत वाद झडत आहेत. मोठा गाजावाजा करत आणलेले मेन्यूकार्ड बाजूला ठेवत मोजके किंवा कंत्राटदाराच्या मर्जीतील पदार्थच जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या वाट्याला येत असल्याचा अनुभवही गेल्या आठवड्यात प्रवाशांना आला. पण त्यावर ओम साई एन्टरप्राइजेस या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी काहीही बोलण्यास नकार दिला.गेल्या आठवड्यात जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये नाश्ता, तसेच जेवणासाठी जेव्हा प्रवाशांना अवघे दोन-तीन पर्याय देण्यात आले तेव्हा काही प्रवाशांनी मेन्यूकार्ड मागितले तेव्हा बराचकाळ ते देण्यातच आले नाही. ज्या वातानुकूलित डब्यातील प्रवाशांनी ही मागणी केली, तेथे काही काळ खानपान सेवेचे कर्मचारी फिरकलेच नाहीत. नंतर जेव्हा अन्य प्रवाशांनी आॅर्डर केलेले पदार्थ वाटण्यासाठी हिरव्या टी शर्टमधील कर्मचारी आले तेव्हा त्यांनी यादीत नसलेल्या उपमा, शिरा, मेदूवडे, कटलेट या पदार्थांसाठी ४० रूपयांपासून ६० रूपये घेतले. तेव्हा पुन्हा प्रवाशांनी दरपत्रक मागितले. पण ते मिळाले नाही. तेव्हा डब्यातील टीसीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर जेवणासाठी फक्त बिर्याणीचाच पर्याय देण्यात आला. त्यामुळे प्रवासी संतापले. त्यांनी पुन्हा मेन्यूकार्ड मागितले तेव्हा त्यावर ५३ पदार्थांची यादी होती. पण त्यातील पहिले पान गहाळ होते. फक्त २६ ते ५३ क्रमांकाच्या पदार्थांच्या यादीची झेरॉक्स दाखवण्यात आली. त्यात दाखवलेल्या किंमतींपेक्षा १० ते २० रूपये अधिक घेतल्याचे लगेचच उघड झाले आणि प्रवाशांचा ओम साईच्या कर्मचाºयांशी वाद सुरू झाला. तेव्हा जीएसटीमुळे दर वाढल्याचा दावा त्यांनी केला. जर या पदार्थांचे बिल दिले जात नसेल तर जीएसटी आकारण्याचा अधिकार काय, असा मुद्दा प्रवाशांनी उपस्थित करताच कर्मचारी निरूत्तर झाले. झेरॉक्स केलेल्या मेन्यूकार्डमध्ये जीएसटीसह किंमती नमूद केल्याचे लक्षात येताच पुन्हा वाद उफाळला आणि हा गब्बरसिंग टॅक्स (जीएसटी) मागे घ्या, असे आवाहन करत काही प्रवाशांनी सांबा, कालिया यांच्या नावाने संवादही सुरू केले. पण कर्मचाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वाद घालणाºया एक-दोन प्रवाशांना जादा घेतलेले दहा-वीस परत करण्यात आले. पण अन्य प्रवाशांना पैसे परत करण्यात आले नाहीत. नंतर टीसींनीही यात मध्यस्थी केली नाही किंवा वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला नाही.पदार्थ थंडगारगाड्या विलंबाने धावत असल्या, तरी त्याची पूर्वकल्पना दिली जात नव्हती. त्यातही दादर, मडगाव, रत्नागिरी अशा स्थानकात पदार्थ तयार करण्याच्या वेळा पाळल्या जात असल्याने गारेगार-बेचव पदार्थ प्रवाशांच्या वाट्याला येत आहेत.उपम्याच्या वड्या : दादरहून मडगावला जाणाºया गाडीत नाश्त्यासाठी उपमा, शिरा, पोहे, कटलेट, आॅम्लेट असे पर्याय होते. प्रत्यक्षात जेव्हा पाकिटबंद पदार्थ आले तेव्हा त्यातील उपमा, शिरा हे पदार्थ द्रवरूप अवस्थेत भरल्याचे लक्षात आले.कारण त्याच्या वड्या पाडूनच ते खावे लागले. त्यातच उपमा, शिरा एकत्र होता. उपमा, मेदूवडा एकत्र होता. पोहेही चिवट-कडक झालेले होते. गरम असतानाच पॅक केल्याने आॅम्लेटला ओल लागली होती. कटलेट, आॅम्लेटसोबत दिलेल्या पावाच्या कडा कडक होत्या.मडगावहून दादरला येताना जेवणासाठी दिलेल्या बिर्याणीत मीठ खूप कमी होते, तर त्यासोबत दिलेला रस्सा इतका तिखट होता की अनेकांना ठसका लागला. तर काहींनी तोंड होरपळल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले. पण काहीही उपयोग झाला नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे