शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मतदानाच्या टक्केवारीवर ठरणार भिवंडीच्या रणांगणातील उमेदवारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:16 IST

कसे असणार मतांचे गणित; भिवंडी पूर्व, पश्चिमची रणनीती ठरणार निर्णायक

- पंढरीनाथ कुंभार भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निर्णायक मतदान करणाऱ्या भिवंडी शहरातील मतदारांसाठी उमेदवारांनी चांगलीच फिल्डिंग लावली, तरी मतदानाचा टक्का किती होणार, यावर निकालाचे गणित ठरणार आहे. भिवंडी शहर व परिसरांत भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन मतदारसंघ असल्याने उमेदवारांनी प्रचाराचा शेवटचा टप्पा भिवंडीत ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून भिवंडीबाहेरील शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम मतदारसंघांत भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी लक्ष वेधले होते. त्यापैकी कपिल पाटील यांनी भिवंडीतील तीनही मतदारसंघांत आपल्या पहिल्या फेरीचा प्रचार रॅलीद्वारे केला आहे.भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे आमदार महेश चौघुले, तर भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे रूपेश म्हात्रे आहेत. दोन्ही मतदारसंघ युतीकडे असले, तरी या मतदारसंघात काँग्रेसचे पारंपरिक मुस्लिम मतदार आहेत. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे यांना भिवंडी पूर्वमध्ये ३२,५०३ मते, तर भिवंडी पश्चिममध्ये ४४,१५३ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपचे जगन्नाथ पाटील यांना भिवंडी पूर्वमध्ये १४,७०७, तर पश्चिममध्ये १४,४०३ मते मिळाली होती. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत.गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना भिवंडी पूर्वमधून ५९,५६२, तर भिवंडी पश्चिममधून ६१,८९५ मते मिळाली होती.भाजपचे कपिल पाटील यांना भिवंडी पूर्वमधून ४०,४२१ तर भिवंडी पश्चिममधून ४२,३९८ मते मिळाली होती. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कामांचा विचार करून मतदार मतदान करतील. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेससाठी पोषक वातावरण असले, तरी यावेळी भाजपला मतदारांचे मन वळवण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. २०१४ मध्ये कपिल पाटील यांनी या भागातील मते गृहीत न धरता कल्याण पश्चिम, मुरबाड व भिवंडी ग्रामीणकडे लक्ष केंद्रित करून बाजी मारली होती. परंतु, यावेळी भिवंडी पूर्व व पश्चिमची मते निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने भाजप महायुतीने या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.तीन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गावकपिल पाटील हे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. त्यांच्यासोबत ग्रामीण कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांची भिवंडी ग्रामीणमध्ये चांगली पकड आहे. मुरबाड व कल्याण पश्चिममध्येदेखील त्यांनी मागील निवडणुकीत चांगली मते घेतल्याने त्यांना यावेळीही साथ मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. ती भाजपसाठी मोठी जमेची बाजू आहे.सुरेश टावरे यांची भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम मतदारसंघांवर चांगली पकड आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. शहापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा असल्याने त्या मतदारांचादेखील आघाडीला लाभ होणार आहे. स्थानिक समीकरणामुळे हे मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.2009साली काँग्रेसचे सुरेश टावरे यांना एकगठ्ठा मते मिळाली होती. त्यामुळे मतदानाची दिशा बदलली.2014साली भिवंडी ग्रामीण, मुरबाड, कल्याण पश्चिममध्ये आघाडी घेत भाजपचे कपिल पाटील निवडून आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी