शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

३९० शाळांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: September 5, 2015 02:52 IST

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत

सुरेश लोखंडे , ठाणेग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत. जिल्हाभरात या सुमारे ३९० शाळा बंद होण्याचे संकट असून त्यातील सर्वच शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रासह आदिवासी, दुर्गम भागातील या ३९० शाळा आहेत. या केवळ ११ व २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत. त्यांच्यावर तर आधीपासूनच बंद होण्याचे संकट ओढवलेले आहे. पण, राज्य शासनाने सुमारे आठवड्याभरापूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार ६० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बंद पडणाऱ्या या शाळांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसारही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शाळा बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी आहेत. त्यांना ३९ हजार ८८४ शिक्षक शिकवत आहेत. ११ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या १२१ शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक १०५ प्राथमिक शाळा, पाच उच्च प्राथमिक,दहा माध्यमिक, एका उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे. यातील सर्वाधिक प्राथमिक ५४ शाळा मुरबाड तालुक्यात असून ३२ शाळा शहापूर तालुक्यात आहेत. या खालोखाल भिवंडीला सात, अंबरनाथला पाच, कल्याणला चार, मीरा-भार्इंदरला दोन आणि उल्हासनगरला एक शाळा आहे. याप्रमाणेच २० पेक्षा कमी असलेल्या २६९ शाळा जिल्ह्यात आहेत. यामध्ये २४९ शाळा प्राथमिक आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळा मुरबाडला ९१, शहापूरला ८८, भिवंडीला ३४, कल्याणला १४, अंबरनाथला १३, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई मनपा क्षेत्रात प्रत्येकी तीन शाळांचा समावेश आहे. ठाणे, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिकेत एक शाळाआहे.