शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी शाळा सुविधांपासून वंचित, २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:58 IST

महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

भिवंडी : महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.महानगरपालिका शिक्षणमंडळाच्या मराठी ३२, उर्दू् ५०,तेलुगू ११, हिन्दी ५, कन्नड १अशा विविध भाषांच्या एकूण ९९ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थींनी व १४ हजार विद्यार्थी असे २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ९७३ शिक्षकांची आवश्यक्यता असताना ८५६ शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजेच ११७ शिक्षक कमी आहेत. त्यापैकी ४५ शाळेत बसायला बेंचेस नाहीत. शालेय साहित्य मनपाकडून मिळत नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर बºयाच शाळांमध्ये शौचालये व बाथरूम नाही, काही शाळांच्या इमारतीचे छत गळत आहेत तसेच विजेची सोय नसल्याने मुलांना अंधारात बसावे लागत आहे तर पंखे सुद्धा सुरू नाहीत.या सर्व मुलभूत सुविधांसाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. मोहीते यांनी मनपाच्या बांधकाम व इतर विभागाकडे पाठपुरावा करूनही केवळ निधी नसल्याने या सोयीपासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शासनाकडून केवळ ५० टक्के शिक्षकांचे वेतन महानगरपालिकेकडे येत असून उर्वरीत ५० टक्के रक्कम देऊन मनपा शिक्षकांचा मासिक पगार करीत आहे. पूर्वी शासनाकडून ८० टक्के वेतन येत होते.मात्र, महानगरपालिका झाल्यापासून ५० टक्के वेतन मिळत असल्याने शिक्षकांचे पगारदेखील वेळेवर होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली असून अद्याप मनपाचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या असुविधेचा सामना करावा लागत असल्याने मनपा शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.