शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

निधीअभावी शाळा सुविधांपासून वंचित, २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:58 IST

महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

भिवंडी : महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.महानगरपालिका शिक्षणमंडळाच्या मराठी ३२, उर्दू् ५०,तेलुगू ११, हिन्दी ५, कन्नड १अशा विविध भाषांच्या एकूण ९९ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थींनी व १४ हजार विद्यार्थी असे २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ९७३ शिक्षकांची आवश्यक्यता असताना ८५६ शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजेच ११७ शिक्षक कमी आहेत. त्यापैकी ४५ शाळेत बसायला बेंचेस नाहीत. शालेय साहित्य मनपाकडून मिळत नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर बºयाच शाळांमध्ये शौचालये व बाथरूम नाही, काही शाळांच्या इमारतीचे छत गळत आहेत तसेच विजेची सोय नसल्याने मुलांना अंधारात बसावे लागत आहे तर पंखे सुद्धा सुरू नाहीत.या सर्व मुलभूत सुविधांसाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. मोहीते यांनी मनपाच्या बांधकाम व इतर विभागाकडे पाठपुरावा करूनही केवळ निधी नसल्याने या सोयीपासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शासनाकडून केवळ ५० टक्के शिक्षकांचे वेतन महानगरपालिकेकडे येत असून उर्वरीत ५० टक्के रक्कम देऊन मनपा शिक्षकांचा मासिक पगार करीत आहे. पूर्वी शासनाकडून ८० टक्के वेतन येत होते.मात्र, महानगरपालिका झाल्यापासून ५० टक्के वेतन मिळत असल्याने शिक्षकांचे पगारदेखील वेळेवर होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली असून अद्याप मनपाचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या असुविधेचा सामना करावा लागत असल्याने मनपा शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.