शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

निधीअभावी शाळा सुविधांपासून वंचित, २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:58 IST

महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

भिवंडी : महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.महानगरपालिका शिक्षणमंडळाच्या मराठी ३२, उर्दू् ५०,तेलुगू ११, हिन्दी ५, कन्नड १अशा विविध भाषांच्या एकूण ९९ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थींनी व १४ हजार विद्यार्थी असे २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ९७३ शिक्षकांची आवश्यक्यता असताना ८५६ शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजेच ११७ शिक्षक कमी आहेत. त्यापैकी ४५ शाळेत बसायला बेंचेस नाहीत. शालेय साहित्य मनपाकडून मिळत नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर बºयाच शाळांमध्ये शौचालये व बाथरूम नाही, काही शाळांच्या इमारतीचे छत गळत आहेत तसेच विजेची सोय नसल्याने मुलांना अंधारात बसावे लागत आहे तर पंखे सुद्धा सुरू नाहीत.या सर्व मुलभूत सुविधांसाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. मोहीते यांनी मनपाच्या बांधकाम व इतर विभागाकडे पाठपुरावा करूनही केवळ निधी नसल्याने या सोयीपासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शासनाकडून केवळ ५० टक्के शिक्षकांचे वेतन महानगरपालिकेकडे येत असून उर्वरीत ५० टक्के रक्कम देऊन मनपा शिक्षकांचा मासिक पगार करीत आहे. पूर्वी शासनाकडून ८० टक्के वेतन येत होते.मात्र, महानगरपालिका झाल्यापासून ५० टक्के वेतन मिळत असल्याने शिक्षकांचे पगारदेखील वेळेवर होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली असून अद्याप मनपाचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या असुविधेचा सामना करावा लागत असल्याने मनपा शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.