शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील हात मदतीसाठी पुढे

By admin | Updated: April 5, 2016 01:18 IST

राज्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. मात्र, राज्यातील दातृत्वाने दुष्काळग्रस्तांना तारण्याचे काम काही प्रमाणात केले आहे.

डोंबिवली : राज्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. मात्र, राज्यातील दातृत्वाने दुष्काळग्रस्तांना तारण्याचे काम काही प्रमाणात केले आहे. दुष्काळग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले आहेत, असे जलअभ्यासक डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. श्री गणेश मंदिर संस्थानने दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचे आवाहन केले होते. त्याला डोंबिवलीकरांनी प्रतिसाद देत ११ लाख रुपयांचा निधी दिला. तर, मंदिर संस्थानने त्यात सहा लाखांची भर टाकून एकूण १७ लाख रुपये दुष्काळग्रस्तांना दिले. या निधीचा विनियोग दुष्काळग्रस्त भागात कशा प्रकारे केला, त्यातून पाणीटंचाई निवारण्याची कामे कशा प्रकारे केली, बंधारे कसे व किती बांधले, याची माहिती पोळ यांनी शनिवारी सायंकाळी दिली. कार्यक्रमानंतर त्यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी ४० खेड्यांत दुष्काळाचे सावट होते. आता हा आकडा शंभरपेक्षा जास्तीच्या घरात पोहोचला आहे. त्याची झळ शहरी भागालाही लागली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न आहे. आता पाणी न वाचवल्यास, भविष्यात यापेक्षा भीषण परिस्थिती उद्भवेल. दुष्काळग्रस्तांसाठी अमुक एका सरकारने प्रयत्न केले आणि एकाने प्रयत्न केले नाहीत, असे म्हणणे रास्त होणार नाही. सत्तेवर आलेल्या व गेलेल्या सरकारांनी दुष्काळग्रस्तांसाठी प्रयत्न केले. दुष्काळ कमी कसा होईल, हे पाहिले. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, त्याची काळजी स्वत: दुष्काळग्रस्तांनीही घेणे आवश्यक आहे. काही मिळाले नाही, तर त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. महाराष्ट्रातील मदतीच्या हातांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे. दुष्काळाचा प्रश्न अजूनही काही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. ते त्याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास तो ते नक्कीच जाणून घेतील. मदत करणाऱ्या हातांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. दुष्काळ निवारणे, हे केवळ एकट्यादुकट्याचे काम नाही. सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, याकडे पोळ यांनी लक्ष वेधले. दुष्काळग्रस्त गावे व मदत करणाऱ्या संस्था यांच्यात कोणीतरी दुवा असण्याची आवश्यकता आहे. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम होत आहे. मीही ‘नाम’शी जोडला गेलेलो आहे. अभिनेता आमीर खान यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे पाणीटंचाईवर प्रकाश टाकला आहे. आता त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यांची भेट घेतली आहे. मात्र, त्यांच्या भेटीला जात असताना पोळ यांना त्यांच्या परिचित व्यक्तीने प्रश्न विचारला की आपण का तेथे जात आहोत. याचाच अर्थ असा की, अनेकांना पाणीप्रश्न कळलेला नाही. त्यांना नीट माहिती नाही. तसेच पोळ हे नेमके काय काम करतात, याविषयी त्यांना नीट माहिती नाही.