शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगर बेघर करण्याचे चार वर्षे प्रयत्न

By admin | Updated: May 26, 2016 03:13 IST

घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती

ठाणे : घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट घातला गेला. मात्र त्याला विरोध झाला. त्यानंतर दोन वर्षांपूर्र्वी देखील पालिकेने या इमारती धोकादायक ठरवण्याच्या हालचाली केल्या. यंदा पुन्हा तसा प्रयत्न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ठाण्यातील श्रीनगर येथील जमिनीचा विकास होऊन इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या कायद्याचे विकासकाने धिंडवडे काढल्यामुळे येथील सदनिका भूमिहीन लोकांच्या पदरात पडल्या नसल्याचा गंभीर आरोप यापूर्वी झालेला आहे. १९८६ ते १९९२ पर्यंत इमारतींचे काम पूर्ण होऊन रहिवासी वास्तव्यास आले. सेक्टर २ सर्व्हे क्र. ४२७ ते ४८५ येथील भूभागावर केवळ २० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट मागील चार वर्षांपासून घातला आहे.महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतो. या यादीमध्ये २०१३ मध्ये श्रीनगर सेक्टर २ सर्व्हे क्र मांक ४२७ ते ४८५ चे मालक म्हणून काँग्रेसच्या एका नेत्याचे नाव प्रसिध्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे या यादीत श्रीनगर मधील एकही इमारतीचे नाव नव्हते. याबाबत वागळे प्रभाग कार्यालयातून अधिक माहिती घेतली असता धोकादायक इमारत फाईलमध्ये त्यावेळी या राजकीय नेत्याच्या खाजगी कंपनीचे दुमजली कार्यालय धोकादायक असल्याची नोंद केलेली होती. त्यावेळीच श्रीनगर वसाहत धोकादायक घोषित करण्याबाबत रहिवाशांनी सहाय्यक आयुक्ताकंडे आक्षेप नोंदवला होता. परंतु तरीही लागलीच पुढच्या वर्षी २०१४च्या धोकादायक इमारतींच्या यादीत पुन्हा श्रीनगर वसाहत धोकादायक जाहीर केली. यंदा कुठलीही नोटीस न देता पुन्हा इमारती धोकादायक ठरवल्या. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. या इमारती ५४ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभ्या असून सध्या या इमारतींमधील जागा प्रति चौ.फू. १५ हजार रुपये दराने विकली जात आहे. या इमारती धोकादायक ठरवून तेथे टॉवर उभे केले तर किमान अडीच लाख चौ.फू.चे बांधकाम केले जाऊ शकते. सध्यापेक्षा जास्त दराने नव्या फ्लॅटची विक्री होणार हे उघड असले तरी सध्याचा १५ हजार प्रति चौ.फू. याच दराने फ्लॅट विकले गेले तरीही श्रीनगर वसाहतीचा पुनर्विकास राजकीय नेते व बिल्डर यांच्याकरिता किमान ३५०० कोटी रुपयांची उलाढाल असेल. त्यामुळे या इमारतींवर गेली चार वर्षे डोळा असण्यामागे हे अर्थकारण हेच कारण आहे. श्रीनगरमधील रहिवासी जागरूक असल्याने व यापूर्वी दोनवेळा त्यांच्या इमारती धोकादायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी महापालिकेतील गोल्डन गँगच्या कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यावर नजरचुकीने इमारती धोकादायक ठरवल्या गेल्याची सारवासारव अधिकारी करु लागले आहेत. मात्र एक-दोन नव्हे तर चक्क ४५ इमारती धोकादायक ठरवणे ही नजरचूक असूच शकत नाही, असे रहिवाशांचे मत आहे. (प्रतिनिधी)नगरसेवकाची मृत आई झाली मालमत्ताधारकविशेष म्हणजे २०१३, २०१४ च्या धोकादायक यादीत किसननगरमध्ये असलेल्या एका काँग्रेस नगरसेवकाच्या धोकादायक इमारतीच्या मालमत्ताधारक यादीतून अचानक नगरसेवकाचे नाव काढून त्यांच्या मयत आईचे नाव २०१५ च्या यादीत टाकण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर आता ही चूकही पालिकेकडून मान्य केली गेली. अशा अक्षम्य चुका करणाऱ्यांवर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोणती कारवाई करतात याकडे श्रीनगरमधील रहिवाशांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.