शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

श्रीनगर बेघर करण्याचे चार वर्षे प्रयत्न

By admin | Updated: May 26, 2016 03:13 IST

घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती

ठाणे : घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट घातला गेला. मात्र त्याला विरोध झाला. त्यानंतर दोन वर्षांपूर्र्वी देखील पालिकेने या इमारती धोकादायक ठरवण्याच्या हालचाली केल्या. यंदा पुन्हा तसा प्रयत्न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ठाण्यातील श्रीनगर येथील जमिनीचा विकास होऊन इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या कायद्याचे विकासकाने धिंडवडे काढल्यामुळे येथील सदनिका भूमिहीन लोकांच्या पदरात पडल्या नसल्याचा गंभीर आरोप यापूर्वी झालेला आहे. १९८६ ते १९९२ पर्यंत इमारतींचे काम पूर्ण होऊन रहिवासी वास्तव्यास आले. सेक्टर २ सर्व्हे क्र. ४२७ ते ४८५ येथील भूभागावर केवळ २० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट मागील चार वर्षांपासून घातला आहे.महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतो. या यादीमध्ये २०१३ मध्ये श्रीनगर सेक्टर २ सर्व्हे क्र मांक ४२७ ते ४८५ चे मालक म्हणून काँग्रेसच्या एका नेत्याचे नाव प्रसिध्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे या यादीत श्रीनगर मधील एकही इमारतीचे नाव नव्हते. याबाबत वागळे प्रभाग कार्यालयातून अधिक माहिती घेतली असता धोकादायक इमारत फाईलमध्ये त्यावेळी या राजकीय नेत्याच्या खाजगी कंपनीचे दुमजली कार्यालय धोकादायक असल्याची नोंद केलेली होती. त्यावेळीच श्रीनगर वसाहत धोकादायक घोषित करण्याबाबत रहिवाशांनी सहाय्यक आयुक्ताकंडे आक्षेप नोंदवला होता. परंतु तरीही लागलीच पुढच्या वर्षी २०१४च्या धोकादायक इमारतींच्या यादीत पुन्हा श्रीनगर वसाहत धोकादायक जाहीर केली. यंदा कुठलीही नोटीस न देता पुन्हा इमारती धोकादायक ठरवल्या. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. या इमारती ५४ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभ्या असून सध्या या इमारतींमधील जागा प्रति चौ.फू. १५ हजार रुपये दराने विकली जात आहे. या इमारती धोकादायक ठरवून तेथे टॉवर उभे केले तर किमान अडीच लाख चौ.फू.चे बांधकाम केले जाऊ शकते. सध्यापेक्षा जास्त दराने नव्या फ्लॅटची विक्री होणार हे उघड असले तरी सध्याचा १५ हजार प्रति चौ.फू. याच दराने फ्लॅट विकले गेले तरीही श्रीनगर वसाहतीचा पुनर्विकास राजकीय नेते व बिल्डर यांच्याकरिता किमान ३५०० कोटी रुपयांची उलाढाल असेल. त्यामुळे या इमारतींवर गेली चार वर्षे डोळा असण्यामागे हे अर्थकारण हेच कारण आहे. श्रीनगरमधील रहिवासी जागरूक असल्याने व यापूर्वी दोनवेळा त्यांच्या इमारती धोकादायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी महापालिकेतील गोल्डन गँगच्या कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यावर नजरचुकीने इमारती धोकादायक ठरवल्या गेल्याची सारवासारव अधिकारी करु लागले आहेत. मात्र एक-दोन नव्हे तर चक्क ४५ इमारती धोकादायक ठरवणे ही नजरचूक असूच शकत नाही, असे रहिवाशांचे मत आहे. (प्रतिनिधी)नगरसेवकाची मृत आई झाली मालमत्ताधारकविशेष म्हणजे २०१३, २०१४ च्या धोकादायक यादीत किसननगरमध्ये असलेल्या एका काँग्रेस नगरसेवकाच्या धोकादायक इमारतीच्या मालमत्ताधारक यादीतून अचानक नगरसेवकाचे नाव काढून त्यांच्या मयत आईचे नाव २०१५ च्या यादीत टाकण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर आता ही चूकही पालिकेकडून मान्य केली गेली. अशा अक्षम्य चुका करणाऱ्यांवर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोणती कारवाई करतात याकडे श्रीनगरमधील रहिवाशांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.