शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चार हजार नागरिक २८ तास विजेविना, खांब पडल्याचे निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:55 IST

बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो.

बदलापूर : बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो. गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील पोखरकरनगर भागात क्रेनच्या धडकेत दोन खांब पडल्यानंतर तब्बल १० तासांनी त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, रात्री उशीर झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ चार हजारांहून अधिक नागरिकांना विजेविना राहावे लागले. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.बदलापूरमध्ये महावितरणच्या कारभारामुळे नव्याने येथे आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. निवासी संकुलात विविध प्रकारच्या सोयीसुविधा असल्या, तरी विजेविना त्याचा फायदा शून्य आहे. यातच गुरुवारी पश्चिमेतील पोखरकरनगरच्या रस्त्याला असलेल्या विजेच्या खांबांना एका खाजगी क्रेनची धडक लागल्याने दोन खांब पडले. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी क्रे नमालकाने दुरुस्तीचे आश्वासन दिले खरे, मात्र काही वेळातच त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अभियंत्याने पोलीस ठाणे गाठत तक्र ार दिली. मात्र, तक्र ार देण्यात एक अभियंता अडकलेला असताना वरिष्ठ अधिकाºयाने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र, चार हजार नागरिकांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याऐवजी बैठकांचे सोपस्कार पार पाडण्यात वरिष्ठ अभियंते अडकले होते. त्यामुळे तक्र ार करून रात्री १० च्या सुमारास टोकावडे येथून आलेल्या दुरुस्ती पथकाने खांब उभे करण्याचे काम सुरू केले.रात्री उशिरापर्यंत विजेचे खांब उभे करण्याचे काम झाले. मात्र, उच्चदाब वाहिन्या घटनास्थळाच्या बाजूने जात असल्याने वीजवाहिन्या टाकणे शक्य नसल्याचे सांगत काम थांबवण्यात आले. त्यामुळे पोखरकरनगर, पाटीलनगर येथील जवळपास चार हजार नागरिकांना फटका बसला. वीज नसल्याने पाण्याचे नियोजनही कोलमडले. शुक्र वारी जवळपास सर्वच घरांत ठणठणाट होता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.