शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

वाहनचालकाचे अपहरण करून हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच २०१२ मध्ये अशाच पद्धतीने एका वाहनचालकाची ...

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच २०१२ मध्ये अशाच पद्धतीने एका वाहनचालकाची गळा आवळून हत्या करणा-या चार आरोपींना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्येप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले गेले होते. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने ही शिक्षा ठोठावण्यात आली.

आकाश गजानन साळुंखे, सचिन ऊर्फ बटाटा सुभाष निचिते, सचिन ऊर्फ सच्च्या सुभाष निचिते आणि दिनेश काळुराम फर्डे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. चौघेही शहापूरचे रहिवासी आहेत. या चौघांनी गाडी चोरण्याच्या उद्देशाने कल्याण येथील एका टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्समधून एक गाडी बुक केली होती. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याचा बेत आखला. त्यानुसार संबंधित गाडीतून प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात वाटेतच ओतुरला चौघांनी रस्सी विकत घेतली. पुढे शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शनही घेतले. परंतु, परतीच्या प्रवासात त्यांनी नाशिकला पोहोचताच आडबाजूला चालक घनश्याम पाठक यांना गाडी थांबविण्याची सूचना केली. पाठक यांनी गाडी बाजूला घेताच चारही जणांनी रस्सीने त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. चारही आरोपींना अटक झाली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. कुंभारे यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर साक्षी, पुरावे तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून ॲड. रचना भोईर यांनी काम पाहिले.

------------------------------------------------------