शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाहनचालकाचे अपहरण करून हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:46 IST

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच २०१२ मध्ये अशाच पद्धतीने एका वाहनचालकाची ...

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच २०१२ मध्ये अशाच पद्धतीने एका वाहनचालकाची गळा आवळून हत्या करणा-या चार आरोपींना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्येप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले गेले होते. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने ही शिक्षा ठोठावण्यात आली.

आकाश गजानन साळुंखे, सचिन ऊर्फ बटाटा सुभाष निचिते, सचिन ऊर्फ सच्च्या सुभाष निचिते आणि दिनेश काळुराम फर्डे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. चौघेही शहापूरचे रहिवासी आहेत. या चौघांनी गाडी चोरण्याच्या उद्देशाने कल्याण येथील एका टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्समधून एक गाडी बुक केली होती. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याचा बेत आखला. त्यानुसार संबंधित गाडीतून प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात वाटेतच ओतुरला चौघांनी रस्सी विकत घेतली. पुढे शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शनही घेतले. परंतु, परतीच्या प्रवासात त्यांनी नाशिकला पोहोचताच आडबाजूला चालक घनश्याम पाठक यांना गाडी थांबविण्याची सूचना केली. पाठक यांनी गाडी बाजूला घेताच चारही जणांनी रस्सीने त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. चारही आरोपींना अटक झाली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. कुंभारे यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर साक्षी, पुरावे तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून ॲड. रचना भोईर यांनी काम पाहिले.

------------------------------------------------------