शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

नेवाळीसाठी चार लाखांची भरपाई

By admin | Updated: June 24, 2017 00:31 IST

ब्रिटिशांनी नेवाळीच्या १५ गावातील १,६७५ हेक्टर जागा संपादित केली. त्यासाठी ५०८ शेतकऱ्यांना त्याकाळी चार लाख ७८ हजार १०७ रुपयांची नुकसानभरपाई दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ब्रिटिशांनी नेवाळीच्या १५ गावातील १,६७५ हेक्टर जागा संपादित केली. त्यासाठी ५०८ शेतकऱ्यांना त्याकाळी चार लाख ७८ हजार १०७ रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. युद्धानंतर जमिनी परत करण्याचे आश्वासन त्यावेळेचे जिल्हाधिकारी फारुकी यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्याच्या कागदपत्रांकडे सर्वांचे लक्ष आहे. ती कागदपत्रे २९ जूनच्या बैठकीत सादर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर १९५३ साली सरकारने या जागेपैकी दोन एकर जागा एमआयडीसीला दिली. १९६४ साली सरकारने १४ एकर जागा भाभा अणुसंशोधन संस्थेला दिली. उर्वरित जागा १९८१ साली नौदलाकडे हस्तांतरित झाली. १९८८ साली कोकण विभागीय आयुक्तांकडे या जागेसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावर काही तोडगा निघाला नव्हता. तेव्हापासून शेतकऱ्यांत प्रकल्पांबद्दल चीड आहे. २०१२ साली आघाडी सरकारने उसाटणे येथे ३०० एकर जागेवर एमएमआरडीएचा सामायिक भरावभूमी प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्याची सुनावणी शेतकऱ्यांनी उधळूून लावली होती. ही जमीन संरक्षण खात्याच्या खास करून पश्चिम सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नौदलाला महत्त्वाची वाटते. पण युद्धजन्य स्थिती नसल्याने संरक्षण खात्याने तेथे काहीही उभारलेले नसले, तरी तेथील धावपट्टी नष्ट केलेली नाही. भोवतालच्या भागात शेती करण्यासही कधी आडकाठी केली नाही. पण नवी मुंबईच्या विमानतळाला विरोध झाल्यावर नेवाळीच्या जागेचा पर्याय पुढे आला आणि या जागेचे ‘मोल’ साऱ्यांच्या ध्यानी आले. जेव्हा या जागेवर कब्जा-वहिवाट दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा नौदलाने संरक्षक भिंत बांधायला घेऊन आपल्या ताब्यातील जमिनीची हद्द निश्चित करण्याचे काम सुरू केले. ही भिंत बांधून पूर्ण झाली तर आपला हक्क संपुष्टात येईल, या भीतीने आंदोलनाला मोकळी वाट करून दिल्याचे शेतकरी-गावकऱ्यांशी बोलल्यावर जाणवते. फक्त शेतकऱ्यांना ही जमीन कसण्यासाठी हवी आहे, की एनए करण्यासाठी याचे उत्तर देण्यास कोणीच तयार नाही.