शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चार दिवसांची दिवाळी

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे

राजू काळे , भार्इंदरजिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरारकरांची ‘पाण्याची दिवाळी’ साजरी होणार आहे. मात्र असे असले तरी त्यानंतरची कपात मात्र सुरुच राहणार असल्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिक्षक एस. जे. निकर्डे यांनी दिले . स्टेमकडून ठाण्यासह मीरा-भार्इंदर व भिवंडी-निजामपूर महापालिकांसह जिल्हा परिषदेंतर्गत ३४ गावांना तर एमआयडीसीकडून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तो प्रामुख्याने बारवी, मोरबे आंध्रा धरणातून उल्हासनदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातून केला जातोे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणातील जलसाठा सुमारे ७० टक्के इतका शिल्लक आहे. त्यामुळे तत्कालिन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कपातीचे संकेत जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून शटडाऊनच्या माध्यमातून पाणी कपातीला सुरुवात झाल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या दोन्ही यंत्रणांपैकी स्टेमचा शटडाऊन प्रत्येक आठवड्याच्या बुधवार ते गुरुवार दरम्यान २४ तासांकरीता तर एमआयडीसीचा शटडाऊन बुधवार ते शुक्रवार दरम्यान ४८ तासांकरीता घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.27तासांची ही पाणीकपात ऐन दिवाळी सणात सुरु झाल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे नागरीकांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. ती रद्द होण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, आमदार मुझफ्फर हुसेन, आमदार नरेंद्र मेहता आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. रस्त्यावर गळती सुरूचनेवाळी : यावर्षी कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना राज्यात मुंबईसह कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दोन दिवस पाणीकपात सुरू केल्याने परिसरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून असंतोष निर्माण झाला आहे. लागोपाठ दोन दिवस पाणी नसल्याने अंघोळ, धुणीभांडी सोडाच काही ना प्यायलाही पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे कल्याण श्रीमलंग रोडवरील रिलॅक्स गार्डन नांदिवली बस थांबा परिसरात पाणीगळती सुरूच असून संपूर्ण रस्ता खड्डे व चिखलमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.