शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांची दिवाळी

By admin | Updated: November 11, 2015 00:16 IST

जिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे

राजू काळे , भार्इंदरजिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरारकरांची ‘पाण्याची दिवाळी’ साजरी होणार आहे. मात्र असे असले तरी त्यानंतरची कपात मात्र सुरुच राहणार असल्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिक्षक एस. जे. निकर्डे यांनी दिले . स्टेमकडून ठाण्यासह मीरा-भार्इंदर व भिवंडी-निजामपूर महापालिकांसह जिल्हा परिषदेंतर्गत ३४ गावांना तर एमआयडीसीकडून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तो प्रामुख्याने बारवी, मोरबे आंध्रा धरणातून उल्हासनदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातून केला जातोे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणातील जलसाठा सुमारे ७० टक्के इतका शिल्लक आहे. त्यामुळे तत्कालिन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कपातीचे संकेत जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून शटडाऊनच्या माध्यमातून पाणी कपातीला सुरुवात झाल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या दोन्ही यंत्रणांपैकी स्टेमचा शटडाऊन प्रत्येक आठवड्याच्या बुधवार ते गुरुवार दरम्यान २४ तासांकरीता तर एमआयडीसीचा शटडाऊन बुधवार ते शुक्रवार दरम्यान ४८ तासांकरीता घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.27तासांची ही पाणीकपात ऐन दिवाळी सणात सुरु झाल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे नागरीकांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. ती रद्द होण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, आमदार मुझफ्फर हुसेन, आमदार नरेंद्र मेहता आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. रस्त्यावर गळती सुरूचनेवाळी : यावर्षी कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना राज्यात मुंबईसह कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दोन दिवस पाणीकपात सुरू केल्याने परिसरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून असंतोष निर्माण झाला आहे. लागोपाठ दोन दिवस पाणी नसल्याने अंघोळ, धुणीभांडी सोडाच काही ना प्यायलाही पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे कल्याण श्रीमलंग रोडवरील रिलॅक्स गार्डन नांदिवली बस थांबा परिसरात पाणीगळती सुरूच असून संपूर्ण रस्ता खड्डे व चिखलमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.