शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त 

By नितीन पंडित | Updated: August 10, 2024 21:25 IST

दिवसा फळविक्रेते रात्री चोरटे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: तालुक्यातील कोनगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोडीतच्या गुन्ह्यातील चार आरोपींना शिताफीने अटक करून चोरीस गेलेले ८ लाख १३ हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

२७ जुलै रोजी कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील २९ मोबाईल चोरी केले होते.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार घोडसरे,गोरले,पाटील,पाटील,वाकसे,गायकवाड,साळुंखे, खडसरे,पाटील या पथकाने आरोपां बाबत कोणतीही माहिती नसताना भिवंडी सह कल्याण डोंबिवली आदी परिसरातील १५० सी सी टि व्ही तपासले त्यामध्ये गुन्हयातील चार चोरटे हे कोनगाव येथुन ऑटो रिक्षा व रेल्वेने  प्रवास करून पनवेल येथे गेले असल्याचे तपासात समोर आले.तेथून सर्वप्रथम इस्माइल नसरुद्दीन शेख वय २६ यास ताब्यात घेतले त्याच्या कडील तपासात इतर तीन चोरटे हे चोरीचा माल घेवुन इंदापुर,पुणे येथे पळून गेले असल्याचे समजले.त्यानंतर पोलिस पथकाने इंदापुर,पुणे येथून मोहिउद्दिन नाझिर शेख ऊर्फ मुया वय ४४,अब्दुल मजीद हसन शेख ऊर्फ मुल्ला वय ४०,इस्माईल नसीरुद्दीन शेख वय २६ या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल नवी मुंबई येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवल्याचे आढळून आल्याने तेथून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशेष म्हणजे हे चार ही आरोपी मुळचे झारखंड येथील असून कल्याण डोंबिवली परिसरात फलविक्रेते म्हणून फिरत असत.त्या दरम्यान चोरी करण्याच्या ठिकाणची रेकी करून रात्री चोरी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.या चार ही जणांचा पूर्वेतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी